Join us

15 वर्षाची मेहनत 'वीरप्पन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 13:29 IST

दिग्दर्शक राम गोपाल वर्माचं क्राईम आणि क्रिमिनल कथांबाबत असलेलं प्रेम हे सर्वश्रुत आहे. याच प्रेमातून रामूनं आजवर अनेक एकाहून ...

दिग्दर्शक राम गोपाल वर्माचं क्राईम आणि क्रिमिनल कथांबाबत असलेलं प्रेम हे सर्वश्रुत आहे. याच प्रेमातून रामूनं आजवर अनेक एकाहून एक सरस सिनेमा केले. मात्र चंदन तस्कर वीरप्पनच्या जीवनावरील सिनेमा बनवण्यासाठी रामूला चांगलीच मेहनत घ्यावी लागली.या सिनेमासाठी रामूनं चक्क दीड दशक रिसर्च केली. वीरप्पनच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची रामूची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. कोणत्याही दहशतवादी संघटनेचा सदस्य नसूनही वीरप्पनं 303 रायफलनं अनेक निरपराधांचा बळी घेतला होता.वीरप्पनच्या या मानसिकतेचा अभ्यास करणं अवघड होतं असं रामूला वाटतं. त्यामुळंच याविषयी रामू आधी पत्नीशी बोलला आणि तत्कालीन तपासाधिका-यांच्या मदतीने वीरप्पनची भेट घेतली.या सगळ्या रिसर्च प्रक्रियेत 15 वर्षाचा कालावधी लागल्याचं रामूनं सांगितलंय.. वीरप्पनच्या जीवनावर कन्नड सिनेमा काही दिवसांपूर्वी आला होता.. आता हिंदी सिनेमा पूर्णतः नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे.