Join us  

Bigg Boss Marathi 3: 'एकटे आलो म्हणून काय झालं...' – तृप्तीताईंच्या कवितेनं सदस्य झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 2:08 PM

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साजरा होणार तृप्तीताईंचा वाढदिवस

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 3)च्या घरामध्ये आज साजरा होणार आहे तृप्तीताईं (Trupti Desai)चा वाढदिवस. ज्या निमित्ताने त्यांनी एक आयुष्यावर भाष्य करणारी सुंदर कविता घरच्या सदस्यांना ऐकवली. तृप्ती ताईंची कविता ऐकून घरातील सर्व सदस्य भावुक झाले. काही सदस्यांना तर अश्रु अनावर झाले. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल गायत्री दातार (Gayatri Datar)बाहेर पडली. आता घरात फक्त सात सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता बिग बॉस मराठीची ही स्पर्धा आणखीन रंजक होणार आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पानं मृत्यू तर पहिलं पानं जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात कारण आपलंच ते कर्म असतं.... चुका जरी झाल्या तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातुनचं आपल्याला पुढे शिकायचं असतं. एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं... इतकी समर्पक कविता सांगितल्यावर घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले.

गायत्री दातार पडली घराबाहेरबिग बॉस मराठीच्या घरामधून काल गायत्री दातारला बाहेर पडावे लागले. आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सात जणांमध्ये रंगणार आहे “टिकिट टू फिनाले” जिंकण्याचा टास्क. मीरा, जय, सोनाली, विशाल, विकास आणि उत्कर्ष यामध्ये बघूया कोणाला मिळणार टिकिट आणि कोणता सदस्य जाणार थेट अंतिम सोहळ्यामध्ये.

टॅग्स :बिग बॉस मराठीतृप्ती देसाईगायत्री दातार