Stock Market Big Prediction: शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अब्जाधीश गुंतवणूकदार रामदेव अग्रवाल यांनी एका मुलाखतीत एक अंदाज वर्तवलाय. भारताचा इक्विटी इंडेक्स सेन्सेक्स २०३० पर्यंत १.५ लाख आणि २०३५ पर्यंत ३ लाखांवर पोहोचेल. हे भारताच्या दीर्घकालीन आर्थिक गती आणि बाजारातील फ्लेक्सिबिलिटीमुळे होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
अधिक माहिती काय?
"जर आपण गेल्या ४५ वर्षांचा इतिहास पाहिला तर बाजार १५% सीएजीआर दराने वाढला आहे, म्हणजेच दर पाच वर्षांनी तो दुप्पट होत आहे. त्यामुळे आता तो ८०,००० वर आहे. मला वाटतं पुढील पाच वर्षांत तो दीड लाखांवर जाईल. २०३० मध्ये तो १.५ लाख आणि २०३५ मध्ये ३ लाखांवर जाईल," असं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक रामदेव अग्रवाल यांनी ईटी मार्केटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम
जगही पुढे जात आहे. १९९५ मध्ये २५ ट्रिलियन डॉलरची असलेली जागतिक अर्थव्यवस्था आता ११५ ट्रिलियन डॉलर झाली आहे. जगाचा विकासदर ५ टक्के असून १५ वर्षांत सोनंही दुप्पट होईल. २०४० मध्ये अर्थव्यवस्था २५० ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल. अशा प्रकारच्या कंपाऊंडिंग ग्रोथमध्ये आपल्याला पुढील २५ वर्षांत सुमारे १० ट्रिलियन डॉलर्स मिळतील, असंही ते म्हणाले.
'२०३५ मध्ये तुम्ही बाजाराला ओळखणार नाही'
गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन विचार करून त्यानुसार स्वत:ची स्थिती तयार करावी, असं अग्रवाल यांचं मत आहे. ते म्हणाले की, शेअर निवडताना तुम्हाला २०३५ पाहावं लागेल. आपण २०३५ मध्ये बाजाराला ओळखणारही नाही, त्यात मोठी वाढ होईल, असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.