Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:17 IST

Tata Group Iran War News: पश्चिम आशियातील युद्धाच्या सावटात एन. चंद्रशेखरन यांनी १०,००० टाटा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. TCS, व्होल्टास आणि टायटनच्या कर्मचाऱ्यांसाठी काय आहे प्लॅन? वाचा.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर संकट ओढवले असताना, देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहाने म्हणजेच 'टाटा सन्स'ने सावधगिरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी समूहातील ३० महत्त्वाच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन व्यावसायिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

बैठकीचे मुख्य अजेंडा आणि चिंतापुरवठा साखळी विस्कळीत होणे: टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टीसीएस सारख्या कंपन्यांचा जागतिक व्यापार मोठा आहे. युद्धाचा फटका कच्च्या मालाच्या आयातीला बसू शकतो, यावर बैठकीत चर्चा झाली. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधनाचे दर वाढल्यास उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाल्यास, टाटा समूहाच्या आयटी आणि पोलाद निर्यातीवर काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करण्यात आले.

वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, टाटा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी २ एप्रिल रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत माहिती दिली की, समूहाचे १०,००० हून अधिक कर्मचारी सध्या या युद्धग्रस्त क्षेत्रातील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक पडल्यास त्यांना भारतात परत आणण्यासाठी समूहाने विशेष आराखडा तयार केला आहे.

व्होल्टास : इंजिनिअरिंग आणि एअर कंडिशनिंग प्रकल्पांमध्ये या कंपनीचा मोठा वाटा आहे.

इंडियन हॉटेल्स : दुबई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये ताज समूहाची हॉटेल्स आहेत.

टायटन : 'दमास' सारख्या मोठ्या ज्वेलरी ब्रँडच्या माध्यमातून टायटनचे कर्मचारी तिथे कार्यरत आहेत.

सीईओना 'सतर्क' राहण्याचे आदेशएन. चंद्रशेखरन यांनी सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना येणाऱ्या काही महिन्यांत अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. विशेषतः टाटा मोटर्स (जॅग्वार लँड रोव्हर) आणि एअर इंडिया या कंपन्यांना या युद्धाचा थेट फटका बसू शकतो, कारण हवाई मार्ग आणि सागरी वाहतूक धोक्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Group assesses Mideast tensions, prioritizes safety of 10,000 employees.

Web Summary : Tata Sons reviews Mideast crisis impact on supply chains, focusing on employee safety. Over 10,000 employees are in affected regions, with plans for their safety and potential repatriation. CEOs are urged to be vigilant amid rising tensions.
टॅग्स :टाटाअमेरिका-इस्रायल-इराण वॉरयुद्धइराण