Will Validity : अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी आपली मालमत्ता कोणाला मिळावी, हे एका साध्या कागदावर लिहून ठेवतात. पण, अशा वसीयतीला भारतीय कायद्यानुसार मान्यता आहे का? हा प्रश्न मालमत्तेच्या वारसदारांच्या मनात नेहमीच असतो. आनंदाची बातमी ही की, भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार, वसीयत साध्या कागदावर लिहिलेली असली तरी ती वैध मानली जाते. मात्र, त्यासाठी कायद्याच्या काही ठराविक अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
वसीयतीसाठी कायदेशीर अटी (भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५)वसीयत नोंदणीकृत असणे किंवा ती स्टॅम्प पेपरवरच असणे कायद्याने अनिवार्य नाही. मात्र, ती वैध ठरण्यासाठी खालील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
- वसीयतकर्त्याची स्वाक्षरी : वसीयत ज्या व्यक्तीच्या नावे आहे, तिने स्वतः त्यावर स्पष्ट स्वाक्षरी केलेली असावी.
- दोन साक्षीदार : वसीयतीवर किमान दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे. साक्षीदारांच्या स्वाक्षरीशिवाय वसीयत पूर्णपणे बेकायदेशीर ठरते.
- साक्षीदारांची उपस्थिती: वसीयतकर्त्याने स्वाक्षरी करताना साक्षीदार हजर असणे गरजेचे आहे. जर वसीयतकर्ता हयात नसेल आणि त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या नसतील, तर ती वसीयत 'शून्य' मानली जाते.
साक्षीदार नसतील तर काय?जर वसीयतकर्त्याने आपल्या इच्छेनुसार सर्व लिहून काढले आणि त्यावर स्वाक्षरीही केली, पण साक्षीदारांच्या स्वाक्षरीचा विसर पडला, तर कायद्याच्या दृष्टीने ती वसीयत अस्तित्वातच नाही, असे मानले जाते. अशा स्थितीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू 'विना-वसीयत' झाला आहे, असे गृहीत धरून वारसा हक्क कायद्यानुसार मालमत्तेचे वाटप केले जाते.
वारसा हक्क कायदा विरुद्ध वसीयतवसीयत असेल तर मालमत्तेचे वाटप वसीयतीत नमूद केलेल्या अटी आणि इच्छेनुसारच होते.वसीयत नसेल तर: मालमत्तेचे वाटप 'उत्तराधिकार कायद्यानुसार' कायदेशीर वारसांमध्ये समान किंवा ठराविक प्रमाणात होते.
वाचा - इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का! 'टॅरिफ'ची अब्जावधी डॉलर्सची रक्कम परत करावी लागणार
अनेकदा वसीयत अवैध ठरल्यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होतात. त्यामुळे, साध्या कागदावर वसीयत लिहिताना ती स्पष्ट असावी आणि त्यावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी, हाच कायदेशीर सल्ला तज्ज्ञ देतात.
Web Summary : A will on plain paper is valid in India if it meets specific legal requirements. It needs the testator's signature and signatures of two witnesses present during signing. Without witnesses, the will is invalid, and inheritance laws apply.
Web Summary : भारत में सादे कागज पर वसीयत तब वैध है जब वह कुछ कानूनी आवश्यकताओं को पूरा करती है। इसमें वसीयतकर्ता के हस्ताक्षर और हस्ताक्षर करते समय उपस्थित दो गवाहों के हस्ताक्षर होने चाहिए। गवाहों के बिना, वसीयत अमान्य है, और विरासत कानून लागू होते हैं।