Join us

Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:00 IST

Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या व्यापारावर होऊ शकतो. इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेन या पश्चिम आशियाई देशांशी भारताच्या व्यापारावर परिणाम होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या व्यापारावर होऊ शकतो. इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेन या पश्चिम आशियाई देशांशी भारताच्या व्यापारावर परिणाम होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. या युद्धाचा परिणाम इराण आणि इस्रायलला होणाऱ्या भारताच्या निर्यातीवर झालाय. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झालीये. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि महागाई वाढू शकते. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनं (जीटीआरआय) म्हटलंय की या तणावामुळे भारताच्या ८.६ अब्ज डॉलरच्या निर्यातीवर आणि ३३.१ अब्ज डॉलरच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच ४१.७ अब्ज डॉलरचा (सुमारे ३.६ लाख कोटी रुपये) व्यापार धोक्यात आला आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील अनेक देशांशी भारताच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. या युद्धाचा परिणाम भारताच्या निर्यातीवर दिसू लागला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत

रविवारी अमेरिकेनं इराणच्या तीन ठिकाणांवर हल्ले केले. यामुळे इस्रायलसोबतचं युद्ध आणखी चिघळलंय. इराणचा अणुकार्यक्रम संपवण्याचं अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. त्याला आपला जुना शत्रू कमकुवत करायचाय. इराणनं अमेरिकेवर धोकादायक युद्ध सुरू केल्याचा आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण प्रदेशात संघर्ष वाढण्याची भीती आहे.

हॉरमुझचाही फटका 

आता इराण-इस्रायल युद्धामुळे आणखी एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे हॉरमुझचाबी परिणाम होत आहे. हॉरमुझचा मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग आहे ज्यातून तेलाची जहाजे जातात.  या मार्गामुळे कच्च्या तेलाच्या टँकरच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाच्या टँकरला नवीन मार्ग सापडतील, परंतु यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील. इतर उत्पादनांच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावत असल्यानं महागाईवर याचा परिणाम होणार आहे. म्हणजेच तेलाच्या जहाजांना इतर मार्गानं जावं लागेल, ज्यामुळे कच्चं तेल महाग होईल आणि महागाई वाढेल, असं तज्ज्ञानं सांगितलं.

दोन्ही देशांशी भारताचा किती व्यापार ?

गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) भारताने इराणला १.२४ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. यामध्ये बासमती तांदूळ (७५.३२ कोटी डॉलर), केळी (५.३२ कोटी डॉलर), सोया मील (७.०६ कोटी डॉलर), बंगाल हरभरा (२.७९ कोटी डॉलर) आणि चहा (२.५५ कोटी डॉलर) यांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची इस्रायलला निर्यात २.१ अब्ज डॉलर आणि आयात १.६ अब्ज डॉलर होती.

टॅग्स :इराणइस्रायलभारत