Join us

राज्यात उन्हाचा चटका वाढणार, पुढील चार दिवस विदर्भ ढगाळणार हलक्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:12 AM

निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल.

पश्चिमी वाऱ्याच्या झंझावाताची साखळी खंडित होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, तीव्र, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी आता संपत आहे.

निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञमाणिकराव खुळे यांनी दिली.

आजपासून (दि.१४) चार दिवसांनंतर विदर्भातील केवळ अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली अशा ४ जिल्ह्यांत १६ ते १९ मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहील. अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

तेव्हा उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी घाबरू नये. तेथे वातावरण कोरडेच राहील, असा अंदाज खुळे यांनी दिला आहे.

खंडित होत जाणाऱ्या प. झंझावाताच्या साखळ्या अन् एल निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, ह्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता नाही, असे खुळे म्हणाले.

राज्यातील कमाल व किमान तापमान

पुणे३६.१ १४.९
नाशिक३३.३ १५.६
सोलापूर३९.४ २१.६
मुंबई२९.८ २२.०
छत्रपती संभाजीनगर ३५.६ १८.५
यवतमाळ३९.५ १९.०
टॅग्स :हवामानतापमानपाऊसविदर्भ