Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crop Damage : अवकाळीचा कहर! गहू आडवा, कांदा भिजला; संत्रा बागा उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:22 IST

Crop Damage : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीस आलेला गहू आडवा पडला, कांदा शेतातच भिजला तर संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे. सुमारे ११७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Crop Damage)

अमरावती : विदर्भात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.(Crop Damage)

चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे आणि अचलपूर तालुक्यांमध्ये मिळून सुमारे ११७ हेक्टरवरील पिके बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली आहे.(Crop Damage)

गव्हाचे मोठे नुकसान; काढणीवर परिणाम

सध्या गव्हाची काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे.

६९ हेक्टरमधील काढणी केलेला व गंजीत ठेवलेला गहू भिजला

३७ हेक्टरमध्ये काढणी सुरू असलेल्या कांद्याला फटका

अनेक ठिकाणी उभा गहू पावसामुळे आडवा पडला असून, उत्पादन आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कांदा शेतातच भिजण्याचा धोका

कांद्याची काढणी सुरू असताना अचानक पावसाने मोठा अडथळा निर्माण केला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने:

साठवणूक कठीण

गुणवत्तेत घसरण

बाजारभाव कमी होण्याची शक्यता

आसेगाव पूर्णा परिसरात ही परिस्थिती गंभीर असून शेतकरी चिंतेत आहेत.

संत्रा बागांना गारपिटीचा फटका

मोर्शी-वरूड परिसरात गारपिटीमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबिया बहारातील संत्री झाडांवरून गळून पडली

फळांच्या गुणवत्तेवर परिणाम

बाजारभाव मिळण्यावर प्रश्नचिन्ह

यामुळे संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

इतर पिकांनाही फटका

धामणगाव तालुक्यात ५ हेक्टरमधील आंबा बाधित

चांदूरबाजारमध्ये ६ हेक्टर हरभऱ्याचे नुकसान

रिद्धपूर, नेरपिंगळाई भागात गहू, हरभरा आणि कांद्याचे नुकसान

भाजीबाजारात साठवलेला मालही पावसामुळे ओला झाला आहे.

हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची मागणी

संत्रा, गहू आणि कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीच्या टप्प्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. गहू, कांदा आणि संत्रा या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामान कसे राहते, यावरच आता बळीराजाचे भवितव्य अवलंबून आहे.

हे ही वाचा सविस्तर :Hailstorm Crop Damage : लातूरमध्ये अचानक हवामान बदल; काढणीच्या तोंडावर वादळी पावसाचा तडाखा!

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain Havoc: Wheat Flattened, Onions Soaked, Orange Orchards Destroyed

Web Summary : Unseasonal rains and hailstorms in Vidarbha severely damaged rabi crops. Wheat, onion, and orange crops suffered significant losses. Farmers face financial distress as harvesting is disrupted and quality diminishes. Compensation is urgently needed.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीगहूकांदा