राज्यात नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकरी बांधावरच निर्माण करतील यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन (१००% राज्य पुरस्कृत योजना) सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवणे.◼️ जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवुन जमिनीची सुपिकता व आरोग्य सुधारणे.◼️ रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे.◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्य साखळी विकसित करणे.◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे.◼️ शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैव निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.
योजनेची व्याप्तीराज्यातील सर्व ३४ जिल्हे
योजनेचे स्वरूप/बाबी/घटक/अनुदान मर्यादा◼️ गट आधारित, ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट, १० गटांची एक शेतकरी उत्पादक कंपनी.◼️ एकदा निवड केलेल्या लाभार्थी/गटास ३ वर्षे लाभ.◼️ प्रति शेतकरी २ हेक्टरच्या मर्यादेत लाभ.◼️ सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण, शेतात सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे, सेंद्रिय प्रमाणिकरण करणे, सेंद्रिय मालाची मूल्यवृद्धी करून विक्री व्यवस्था करणे.◼️ रु. १३,२००/- प्रति हेक्टर म्हणजेच रु. ६.६० लाख प्रति गट तीन वर्षात अर्थसहाय्य.
लाभार्थी पात्रतेचे निकष◼️ योजनेत एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देय राहील.◼️ रासायनिक खते, किटकनाशके व तणनाशके तसेच बी.टी. बियाणे वापरता येणार नाहीत.◼️ सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आवश्यक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास स्वेच्छेने तयार असलेल्या शेतकऱ्यांची निवड करावी.◼️ सेंद्रिय शेतीबद्दल जागृत असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत प्राथम्याने सहभाग करावा.◼️ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील त्या त्या जिल्ह्यातील प्रवर्गांच्या शेतकऱ्यांच्या प्रमाणात किमान शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड करावी.◼️ महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देवून किमान ३० टक्क्यांपर्यंत महिलांचा योजनेत सहभाग राहील असे पहावे.◼️ समुह स्तरावर स्थापन होणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये शेतकऱ्यांना भागधारक होणे बंधनकारक आहे.
कार्यान्वयीन यंत्रणाराज्यस्तरावर कृषी संचालक (आत्मा), जिल्हास्तरावर-प्रकल्पसंचालक, आत्मा (सर्व)
अधिक माहितीसाठीकृषी विभाग सहायक कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आत्मा (बीटीएम) यांचेकडे संपर्क साधावा.
अधिक वाचा: सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर