Agriculture News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Mahatma Fule Krushi Vidyapith Rahuri) विकसित ट्रॅक्टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्राचा (Bahupik Tokan Yantra) उपयोग करावा.
भुईमुग, तूर, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, करडई, सुर्यफुल इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाण्याच्या बाजूला देता येते.
- शिफारशीप्रमाणे २ ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.
- प्रत्येक फणाच्या बियाण्यांच्या पेट्या वेगळ्या असल्यामुळे तुरीसारख्या आंतरपीकांची टोकणसुद्धा करता येते.
- हे यंत्र ३५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर चालते.
- एका दिवसात जवळजवळ ३ ते ३.५ हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
- मान्सून तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी जसे पश्चिम घाट विभाग (इगतपुरी, त्र्यंबकेश्वर) व उपपर्वतीय विभाग (पेठ, सुरगाणा व नाशिकचा काही पश्चिम भाग) खरीप भात. नागली, वरई पिकांची रोपवाटिकेत पेरणी सुरु ठेवावी.
- तसेच पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभाग जसे (सिन्नर, देवळा, येवला, पूर्व नाशिक व दिंडोरी) ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला आहे म्हणून खरीप पिकांची पेरणी सुरु करावी.
- पेरणी योग्य पाऊस नसलेल्या ठिकाणी जसे (चांदवड, मा लेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण व निफाड) वाफसा आल्यानंतरच (६५ ते १०० मी.मी. पाऊस) पेरणी सुरु करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी