Amba Kadhani : आंबा फळ काढणी ही योग्य वेळी (फुलोऱ्यापासून १२०-१४० दिवस) आणि योग्य पद्धतीने करणे, फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात...
फळ काढणीचे नियोजन
- आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते.
- अवीट गोडीचा हापूस खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रसासाठी व परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो.
- एप्रिल महिन्यापासून गोड केसर, रसाळ पायरी याच बरोबर तोतापुरी, नीलम, आम्रपाली, दशहरी हे आंबेदेखील उपलब्ध होणे सुरू होते.
- हापूसपासून विकसित संकरित रत्ना, सिंधू, सुवर्णा, सोनपरी या जातींना देखील बाजारात वाढती मागणी आहे.
- आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी तो वेळेवर काढणे आवश्यक आहे.
- वातावरणाचा आंब्याच्या पक्वतेवर परिणाम होताना आढळतो.
- कातळावरून परिवर्तित होऊन उष्णता वाढल्यामुळे समुद्रकिनारी आंबा ९० ते १०० दिवस तर अंतर्गत भागात १२५ ते १३५ दिवस तयार होण्यासाठी घेतो.
- आंब्याला मोहोर टप्प्याटप्प्यात आल्यास तीन ते चारवेळा काढणी करणे आवश्यक आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
