Join us

krushi salla: बदलत्या हवामानात पिकांची अशी घ्या काळजी वाचा कृषी सल्ला सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:53 IST

Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी अवकळी पावसाच्या सरी बरसतात तर कधी उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. त्यामुळे बदलत्या हवामान (changing weather) पिकांची (crops) कशी काळजी घ्यावी यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी जारी केल्या आहेत त्या वाचा सविस्तर (Krushi Salla)

Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी अवकळी पावसाच्या सरी बरसतात तर कधी उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. त्यामुळे बदलत्या हवामान(changing weather) पिकांची(crops) कशी काळजी घ्यावी यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी जारी केल्या आहेत त्या वाचा सविस्तर(Krushi Salla)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण- पूर्व भागात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.(changing weather)

छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी रात्र उबदार राहील. मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर पुढील ३ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.(changing weather)

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण- पूर्व भागात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.(changing weather)

छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी रात्र उबदार राहील. मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर पुढील ३ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ११ ते १७ एप्रिलदरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.(changing weather)

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.(changing weather)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Krushi Salla) शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

* मळणी केलेल्या रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

* काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

* उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) किडींना आकर्षित करण्यासाठी एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (३० पीपीएम) ३ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

* घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

* आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत जिब्रॅलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. द्राक्ष बागेतील माती मोकळी करून खत व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उष्मा वाढतोय तर दुसरीकडे अवकाळीचं संकट वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन