Tur Kharedi : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने हमी दराने (MSP) तूर खरेदीसाठीची मुदत १ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे.(Tur Kharedi)
२७ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सरकारी खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील उर्वरित तूर या कालावधीत खरेदी केली जाणार आहे.(Tur Kharedi)
आधीची मुदत संपली, पण खरेदी बाकी
यापूर्वी हमी दराने तूर खरेदीची अंतिम तारीख २५ एप्रिल होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडील तूर अद्याप विक्रीसाठी शिल्लक असल्याने खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने मुदतवाढ देत आणखी काही दिवसांची संधी उपलब्ध करून दिली आहे.
नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच लाभ
जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीकृत प्रमाणात तूर सरकारी खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे.
हमी दराचा आधार
केंद्र सरकारने तुरीसाठी जाहीर केलेला हमी दर ८,००० रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या बाजारात तुरीला यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सरकारी खरेदी केंद्रांकडे वाढला आहे. बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हमी दराचा पर्याय निवडत आहेत.
बाजारभावामुळे वाढला दबाव
तुरीचे दर सध्या ७,३०० ते ७,६५० रुपये दरम्यान स्थिर असल्याचे दिसून येते. त्यामुळे हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी हमी दरावर विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची संधी
मुदतवाढ मिळाल्याने अजून तूर विक्री बाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वेळेत तूर विक्री करून हमी दराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काय लक्षात ठेवावे?
१ मेपर्यंतच खरेदीची मुदत
सरकारी केंद्रावरच विक्री करावी
आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत
बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असताना शासनाने दिलेली ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
योग्य वेळी तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक तोटा टाळता येणार असून, हमी दराचा पूर्ण लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!
अधिक वाचा : harbhara kharedi : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर
Web Summary : The Maharashtra government extended the tur procurement deadline to May 1, 2026, benefiting registered farmers. This offers relief as market prices are lower than the government's guaranteed rate of ₹8,000 per quintal. Farmers can now sell their remaining stock at government centers.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने तुअर खरीद की समय सीमा 1 मई, 2026 तक बढ़ा दी, जिससे पंजीकृत किसानों को लाभ होगा। इससे राहत मिलती है क्योंकि बाजार मूल्य सरकार द्वारा गारंटीकृत ₹8,000 प्रति क्विंटल की दर से कम है। अब किसान सरकारी केंद्रों पर अपना बचा हुआ स्टॉक बेच सकते हैं।