Join us

Soybean Market: शासन धोरणाने 'सोयाबीन दरवाढीचे स्वप्न' मोडलं; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:45 IST

Soybean Market: पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा उधळून लागल्या आहेत. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात (Import Duties) कपात केली आणि त्याचा थेट फटका सोयाबीनच्या दराला बसला. वाचा सविस्तर (Soybean Market)

गजानन मोहोड

पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा उधळून लागल्या आहेत. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात (Import Duties) कपात केली आणि त्याचा थेट फटका सोयाबीनच्या दराला बसला. (Soybean Market)

काही दिवसांतच क्विंटलमागे ३०० रुपयांची घसरण झाल्याने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभर शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाले नाहीत, उलट आयातधोरणामुळे त्यांच्या हातात पुन्हा एकदा मातीमोल भावच उरले आहेत.(Soybean Market)

केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर थेट परिणाम झाला आहे. दरवाढीची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक धक्का सहन करावा लागत आहे. (Soybean Market)

साठवणूक केलेला माल आता मातीमोल दरात विकावा लागतो आहे, तर पेरणीच्या तोंडावर उत्पन्न घटल्याने नवीन पेरणीसाठीही आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या अपेक्षांना तडा

यंदा केंद्र शासनाच्या आयात धोरणामुळे (Import Duties) शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत बाजारभाव कोसळले आहेत. सोयाबीन दरवाढ होईल, या आशेवर आठ-आठ महिने माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर दरात घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 

सध्या सोयाबीनचे भाव क्विंटलमागे ४ हजार १०० रुपयांवर घसरले आहेत, जे काही दिवसांपूर्वी ४ हजार ४०० रुपयांवर होते. यामागे कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात केंद्राने केलेली १० टक्के कपात हे प्रमुख कारण आहे.

आयात धोरणाचे प्रत्यक्ष परिणाम

* खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या पामतेल, सूर्यफूल तेल, आणि सोयातेलावरील आयात शुल्कात कपात केली. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर झाला आहे. 

* सोयाबीनसोबत सोयापेंडच्या दरातही घसरण होऊन ते २७ ते २८ हजार रुपये प्रति टनावर आले आहेत. यामुळे तेल गाळणी उद्योगांना फायदा झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हातात मात्र मातीमोल दरच पडत आहेत.

बाजारभावातील चढ-उतार (रु./क्विंटल)

दिनांक किमान भाव    कमाल भाव
१६ मे४,०५०४,३२० 
२२ मे४,१००४,२६५ 
३० मे४,०५०४,२०० 
०२ जून३,९५०४,१०० 

शेतकऱ्यांची फसवणूक

* शेतकऱ्यांना मागील वर्षी क्विंटलमागे सरासरी  ४ हजार ८९२ रुपये मिळाले होते. यंदा मात्र वर्षभर हा दर कधीच दिसला नाही. उलट ३ हजार ८०० ते ४ हजार २०० च्या दरम्यान दर घसरले. 

* नाफेडनेही लवकर खरेदी थांबवली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गरजेपोटी, कमी दरात माल विकला. 

* दर वाढतील म्हणून काही शेतकऱ्यांनी साठवणूक केली, मात्र पेरणीच्या तोंडावर बाजारपेठेत अपेक्षेच्या विरुद्ध स्थिती ओढवली आहे.

तुरी-हरभऱ्याच्याही दरात घसरण

केंद्र शासनाने वाटाण्यावरील आयात शुल्क रद्द केल्यामुळे हरभरा आणि तुरीच्या दरावरही परिणाम झाला आहे.

तूर: ६,३३५ ते ६,४०० 

हरभरा : ५,३०० ते ५,४५० 

हे दरही मागील वर्षाच्या तुलनेत कमीच आहेत.

कच्चे तेलावरील आयात शुल्क कमी झाले आहे. डीओसीचे आंतरराष्ट्रीय दर घसरले. शिवाय वाटाण्यावरील आयात शुल्क रद्द झाल्यामुळे तूर आणि हरभऱ्याचे दरही कोसळले आहेत. - अमर बांबल, अडते, बाजार समिती, अमरावती

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारशेतकरीशेतीमार्केट यार्डमार्केट यार्डकेंद्र सरकार