Join us

Kanda Market : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांदा संकटात आहे का? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:52 IST

Kanda Market : आजही भारत कांदा उत्पादनात सर्वात पुढे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा निर्यातीचे नियोजन, किमती आणि वेळेवर होणारा पुरवठा महत्त्वाचा असतो. 

Kanda Market : भारताने गेल्या वर्षी कांद्याच्या निर्यातीवर (Kanda Export) ४० टक्के शुल्क लादले होते, जे काही महिन्यांनी २० टक्के करण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांपूर्वी हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले. मात्र या कालावधीत पाकिस्तानने संबंधित देशांमध्ये आपल्या कांद्याची विक्री करत बाजारात स्थान निर्माण केले. परिणामी भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने आता भारतीय कांदा संकटात सापडला आहे. 

गेले काय वर्षात कांदा निर्यातीत (Kanda Export) सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. १९ ऑगस्ट २०२३ रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले त्यानंतर ८०० डॉलर प्रतिदिन निर्यात मूल्य देखील लावण्यात आले. त्यावर्षी म्हणजेच २०२३-२४ २५.२५ लाख मेट्रिक टन निर्यात झाली. तर २०२४-२५ १७ लाख मेट्रिक टन निर्यात झाली. म्हणजेच निर्यात घटल्याचे दिसून आले. 

यामुळे खरेदीदारांनी अन्य कांदा उत्पादक देशांकडे मोर्चा वळवत खरेदीला सुरुवात केली. यात पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानने स्थानिक बाजारात कांदा दर वाढूनही निर्यातीवर निर्बंध लावले नाहीत. एकीकडे आजही भारत कांदा उत्पादनात सर्वात पुढे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा निर्यातीचे नियोजन किमती आणि वेळेवर होणारा पुरवठा महत्त्वाचा असतो. 

भारताचा सर्वात मोठा कांदा आहे तर हा बांगलादेशातून जवळपास २० टक्के कांदा आयात (Kanda Aayat) करत असतो. मागील वर्षी बांगलादेशात निर्यात न झाल्याने स्थानिक कांदा उत्पादनावर भर देण्यात आला. त्यामुळे अद्यापही बांगलादेशात स्थानिक कांदा बाजारात असून भारतीय कांद्याची निर्यात अजूनही ठप्प असल्याचं दिसत आहे. शिवाय भारताने मध्यतंरी लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदार इतर देशांकडून कांदा खरेदी करण्यात धन्यता मानत आहेत. 

एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारात १७० डॉलर प्रति टन दराने कांदा विक्री करत आहे. तर, भारतीय कांद्याची किंमत ही जवळपास ३३० डॉलर प्रति टन आहे. चीनदेखील २५० डॉलर प्रति टन कांदा विक्री करत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी कांद्याची आवक सुरू असल्याने भारतीय कांद्याची मागणी नसल्याचे सांगितले जात आहे.

सध्याच्या दरामुळे शेतकर्‍यांना हातात काहीच उरत नाही. यासाठी सरकारने  शेतकरी ना  प्रोत्साहन दिले पाहिजे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी खूपच कमी आहे. यामुळे नवीन आंतरराष्ट्रीय कांदा बाजारपेठ शोधण्याची  आवश्यकता आहे.

 - विकास सिंह, उपाध्यक्ष, कांदा निर्यातदार नाशिक

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती