Join us
Daily Top 2Weekly Top 5

Halad Market : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; हिंगोलीत ६ दिवसांपासून हळद बाजार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:54 IST

Halad Market : हिंगोली येथे हळदीचे मार्केट सलग सहा दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात हळद विकावी लागत असून, खुल्या बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी वाढली आहे.(Halad Market)

Halad Market : विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील हळदीचे 'बीट' मागील सहा दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.(Halad Market) 

आवक वाढल्याचे कारण देत प्रशासनाने लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने माल विकण्याची वेळ आली आहे.(Halad Market)

पडत्या भावात विक्री; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

मार्केट यार्ड बंद असल्याचा थेट फायदा खुल्या बाजारातील व्यापारी घेताना दिसत आहेत. सध्या हळदीला केवळ १२,००० रुपये ते १३,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, शेतकऱ्यांच्या मते किमान १५,०००० ते १८,००० रुपये दर अपेक्षित होता. यामुळे प्रत्येक क्विंटलमागे ५०० ते १,००० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.

ऐन हंगामात बाजार बंद; दुहेरी संकट

हळदीचा हंगाम सुरू असतानाच बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

एकीकडे नैसर्गिक अडचणी

दुसरीकडे प्रशासकीय निर्णय

यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे.

विलंबामुळे वाढतोय खर्च

आवक क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने मोजमाप प्रक्रियेला २ ते ४ दिवस लागतात.

या विलंबामुळे शेतकऱ्यांना खालील समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कडक उन्हात मार्केट यार्डात मुक्काम

वाहन भाड्यात वाढ

राहण्याचा व खाण्याचा अतिरिक्त खर्च

हळदीच्या वजनात घट

परिणामी, हातात येणारा नफा आणखी कमी होत आहे.

खुल्या बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी

बाजार समिती बंद असल्याने खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.

कमी दरात खरेदी

कोणतेही नियंत्रण नाही

तपासणी किंवा चौकशीचा अभाव

यामुळे शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून खालील मागण्या होत आहेत.

तातडीने मार्केट यार्ड सुरू करावे

अतिरिक्त मनुष्यबळ लावून मोजमाप प्रक्रिया गतीमान करावी

हंगामात बीट बंद ठेवू नये

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

हंगामाच्या काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खुल्या बाजारातील लुटीवर नियंत्रण नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही शंका व्यक्त होत आहे.

हिंगोलीतील हळद उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी कात्रीत सापडला आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे योग्य दर मिळत नाही, तर खुल्या बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. परिस्थिती तातडीने सुधारली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हिंगोलीत हळदीचा पूर! मोजमापाला २ दिवस, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

अधिक वाचा : Halad Bajarbhav : हळदकोंडी! इंडेक्सवर तेजी, पण बाजारात भाव घसरले; कारण काय?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Market Halt in Hingoli Causes Losses for Farmers

Web Summary : Hingoli's turmeric market shutdown for six days hurts farmers. They're forced to sell at lower prices due to administrative delays and trader exploitation, causing significant financial losses during peak season.
टॅग्स :शेती क्षेत्रहिंगोलीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती