Join us

e-NAM Scheme : ई-नाम योजनेचा उमरग्यात शुभारंभ: शेतकऱ्यांना मिळणार राष्ट्रीय बाजारपेठेचा फायदा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:30 IST

e-NAM Scheme : शेतीमाल (Shetmal) विक्रीत क्रांती घडवणारी 'ई-नाम' योजना (e-NAM Scheme) आता उमरग्यात पोहोचली आहे. पारंपरिक बाजारपेठेच्या मर्यादा ओलांडून शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांशी थेट व्यवहार करता येणार आहे, त्यामुळे दरात स्पर्धा वाढून फायदा थेट शेतकऱ्यांच्या हाती जाणार आहे. वाचा सविस्तर

e-NAM Scheme : शेतीमाल (Shetmal) विक्रीत क्रांती घडवणारी 'ई-नाम' योजना (e-NAM Scheme) आता उमरग्यात पोहोचली आहे. पारंपरिक बाजारपेठेच्या मर्यादा ओलांडून शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांशी थेट व्यवहार करता येणार आहे, त्यामुळे दरात स्पर्धा वाढून फायदा थेट शेतकऱ्यांच्या हाती जाणार आहे. (e-NAM Scheme)

शेतकऱ्यांना शेतीमालास (Shetmal)  योग्य बाजारभाव मिळावा, व्यवहार पारदर्शक व्हावेत आणि राष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेचा उमरगा बाजार समितीमध्ये प्रभावी अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.(e-NAM Scheme)

या पार्श्वभूमीवर उमरगा बाजार समितीच्या सभागृहात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने नियुक्त केलेले मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांच्या उपस्थितीत ई-नामविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शेतकरी, व्यापारी, परवानाधारक आडते व समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी झाले. (e-NAM Scheme)

ई-नाम म्हणजे काय?

ई-नाम (e-NAM) ही भारत सरकारची योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी देशभरातील बाजारात समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यामधून ऑनलाईन बोली, शेतीमालाचे ग्रेडिंग, योग्य वजन व बिल, तसेच आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यांचा समावेश होतो.

ई-नाम योजनेचे फायदे 

* योग्य भाव : शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल. 

* स्पर्धा : राज्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार आणि व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य झाल्यामुळे स्पर्धा वाढेल, ज्यामुळे चांगला दर मिळू शकेल. 

* पारदर्शकता : व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. 

* राष्ट्रीय बाजारपेठ : भविष्यात गावातील शेतमालाला राष्ट्रीय स्तरावरही बाजारपेठ उपलब्ध होईल. 

* आर्थिक सुरक्षितता : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमांबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होईल. 

नोंदणी कशी कराल?

ऑनलाइन : गुगल प्ले स्टोअरवरून e-NAM App डाउनलोड करा.

ऑफलाइन : स्थानिक बाजार समितीकडे थेट जाऊन नोंदणी करता येईल.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक (झेरॉक्स)

मोबाईल नंबर

उमरग्यातील प्रगती

२६ व्यापाऱ्यांचा ई-नाममध्ये समावेश झाला असून १ हजार १३२ शेतकऱ्यांची आतापर्यंत यशस्वी नोंदणी करण्यात आली आहे.

या वेळी सभापती बसवराज कस्तुरे, उपसभापती विजयकुमार माने, संचालक प्रल्हाद काळे, सुभाष गायकवाड, सचिव सिद्धप्पा घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेतीमालास योग्य भाव, शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग) योग्य हाताने व मालाचे योग्य वजन तसेच विक्री झालेल्या मालाची राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदारांना व व्यापाऱ्यांना देखील बोली लावणे या योजनेअंतर्गत शक्य होणार आहे. - रंगनाथ कटरे, मार्गदर्शक, कृषी मंत्रालय

केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे. यासाठी बाजार समितीच्या एकूण २६ व्यापाऱ्यांना ई-नाम योजनेमध्ये समाविष्ट केले असून, ई-नाममध्ये एकूण १ हजार १३२ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. - सिद्धप्पा घोडके, सचिव

हे ही वाचा सविस्तर : Kharif Season Update : शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद, खत विक्रीही वेगात वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकेंद्र सरकार