Join us

Save Soil Health : करूया राखण पोषक घटकांच्या मातीची; हमी मिळेल, सुरक्षित अन्न धान्यांसह भरभराटीच्या पिकांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 22:19 IST

Save Soil Health : आजच्या काळात हवामान बदल (Climate changes) आणि वाढलेल्या रासायनीक वापरामुळे मातीचा (Chemical Use In Soil) ऱ्हास होऊ लागला आहे. परिणामी मातीचा ऱ्हास होण्यामुळे पाण्याची उपलब्धता (Water Storage) कमी होते, मातीतील पोषक घटकांची (Soil nutrients) कमी होते, आणि अन्न सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे मातीचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन हे अत्यावश्यक आणि गरजेचे झाले आहे.

आपल्या पृथ्वीवर जीवन टिकून राहण्यासाठी मातीचे महत्त्व अनमोल आहे. मातीमधून आपल्याला ९५ टक्के अन्न मिळते. मातीचे आरोग्य हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तेच आपल्याला अन्न, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधने पुरवते.

आजच्या काळात हवामान बदल आणि वाढलेल्या रासायनीक वापरामुळे मातीचा ऱ्हास होऊ लागला आहे. परिणामी मातीचा ऱ्हास होण्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी होते, मातीतील पोषक घटकांची कमी होते, आणि अन्न सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे मातीचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन हे अत्यावश्यक आणि गरजेचे झाले आहे.

मातीची काळजी घेतल्यास होणारे फायदे

• मातीचे पोषण : निरोगी मातीमध्ये वनस्पतींसाठी आवश्यक सर्व पोषक तत्वे असतात. सेंद्रिय पदार्थ आणि कंपोस्ट मातीला समृद्ध करतात. ज्यामुळे वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

• मुळांचा विकास : निरोगी मातीची रचना मुळांना चांगले वाढण्यास मदत करते. मजबूत मुळे पोषक तत्वे आणि पाणी चांगल्या प्रकारे शोषू शकतात. परिणामी वनस्पती मजबूत आणि लवचिक होतात.

• पाणी धरणे : मातीची योग्य काळजी घेतल्यास ती पाणी धरून ठेवू शकते. यामुळे पाणी वाहून जाणे कमी होऊन, झाडांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहते आणि पाणी वाया जात नाही.

• पोषक सायकलिंग : निरोगी माती पोषक सायकलिंगला प्रोत्साहन देते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन ते वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वांमध्ये रूपांतरित होऊन त्यांची उपलब्धता वाढते.

• रोग प्रतिकार : चांगल्या सूक्ष्मजीव क्रियाकलापांसह संतुलित माती वनस्पतींच्या रोग प्रतिकारशक्तीला वाढवते. मातीतील फायदेशीर सूक्ष्मजीव वनस्पतींना हानिकारक रोगजनकांपासून संरक्षण देतात.

• शाश्वत शेतीमातीची काळजी घेतल्यामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. यामुळे शेती शाश्वत होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते.

• कार्बन क्रेडिट : निरोगी माती कार्बन क्रेडिट करण्यास मदत करते. सेंद्रिय पदार्थांच्या रूपात कार्बन मातीमध्ये साठवला जातो. ज्यामुळे हवामान बदल कमी होण्यास मदत होते.

• जैवविविधतेचे संरक्षण : निरोगी मातीतील विविध जीवन रूपांमुळे जैवविविधतेचे संरक्षण होते आणि परिसंस्थेची स्थिरता राखली जाते.

• मातीचा ऱ्हास टाळणे : मातीची काळजी घेतल्यामुळे तिचा ऱ्हास होण्याचे प्रमाण कमी होते. धूप आणि वारा कमी होऊन मातीचे नुकसान टाळता येते आणि उत्पादन क्षमता अधिक होते.

• सतत उत्पादन : मातीला योग्य काळजी घेतल्यामुळे तिची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शाश्वत उत्पादन होईल आणि दीर्घकालीन शेतीला मदत होईल.

अशा प्रकारे मातीची काळजी घेणे हे शाश्वत शेती आणि पर्यावरणीय स्थिरतेसाठी आवश्यक आहे. निरोगी माती वनस्पतींना चांगले पोषक, पाणी आणि रोग प्रतिकार क्षमता प्रदान करते. त्यामुळे मातीच्या काळजीमध्ये गुंतवणूक करणे, केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण पृथ्वीच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरते.

५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणूनच साजरा केला जातो ज्याचे मुख्य उद्दिष्ट मातीच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हेच आहे. अशा रीतीने आपण मातीची काळजी घेऊन आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. ज्याद्वारे पुढील पिढ्यांसाठी आपण एक टिकाऊ कृषी परिसंस्था निर्माण करू शकतो.

प्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापककृषि विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालयदहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगरमो. ७८८८२९७८५९

हेही वाचा : Green Manure हिरवळीचे खते देईल साथ; जमिनीची सुपीकता राखत उत्पन्नात होईल वाढ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीसेंद्रिय खतखतेआरोग्यशेतकरी