Pear Benefits : पावसाळ्यात (Monsoon) हवा असतो खास संरक्षणाचा कवच. ते मिळवण्यासाठी डॉक्टरकडे नाही, फळाच्या ताटात बघा. नाशपती तिथे चमकते. (Pear)
हे फळ फक्त चवदारच नाही, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे, पचन सुधारवणारे, हृदयाचं रक्षण करणारे एक नैसर्गिक टॉनिक आहे. पावसाळ्यात नाशपाती खा आणि अनेक आजार दूर ठेवा. (Pear)
पावसाळ्यात आरोग्य टिकवायचंय? मग 'नाशपाती' फळ ठरेल तुमचं नैसर्गिक टॉनिक. या फळात व्हिटॅमिन्स आणि फायबर्सने भरलेली नाशपती फक्त चवदारच नाही, तर अनेक आजारांपासून दूर ठेवते. सर्दी, ताप, खोकला, पचनतंत्र, त्वचा, हृदय... सर्व काही जपणारे हे फळ खरेच अद्भुत आहे. (Pear)
जाणून घ्या जबरदस्त फायदे
पावसाळा सुरू होताच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्याची शक्यता वाढते. या हंगामात ताप, सर्दी, खोकला अशा त्रासदायक आजारांचे प्रमाण वाढते.
अशा वेळी आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत ठेवण्यासाठी नैसर्गिक, पौष्टिक आणि सहज मिळणाऱ्या फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे ठरते. अशाच आरोग्यदायी फळांपैकी एक म्हणजे नाशपती (Pear).
नाशपतीमध्ये असलेले पोषक तत्त्व
१०० ग्रॅम नाशपतीमध्ये खालील प्रमाणात पोषक घटक आढळतात
सोडियम : ९ मि.ग्रॅ.
फॉस्फरस : १४ मि.ग्रॅ.
लोह : २.२ मि.ग्रॅ.
झिंक : १९० मि.ग्रॅ.
मँग्नीज, मोलिब्डेनम, कोबाल्ट, कॉपर, फ्लोरीन, आयोडीन : अल्प प्रमाणात
व्हिटॅमिन : ए, बी1, बी2, सी
कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात
नाशपातीचे आरोग्यदायी फायदे (Benefits of Pear)
पचनक्रिया सुधारते : नाशपातीमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता कमी करते आणि पचनक्रिया सुरळीत ठेवते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन सी मुळे शरीराचा नैसर्गिक बचाव यंत्रणा बळकट होते, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार दूर राहतात.
हृदयाचे आरोग्य सुधारते : नाशपातीतील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयविकाराचा धोका कमी करतात.
वजन कमी करण्यास मदत : कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने नाशपाती वजन कमी करणाऱ्यांसाठी योग्य आहे.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : नाशपाती मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
दाह-विरोधी गुणधर्म : शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी नाशपाती उपयोगी ठरते. (Anti-inflammatory)
कर्करोगाचा धोका कमी करते : नाशपातीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक पेशींवर नियंत्रण ठेवतात.
त्वचेसाठी फायदेशीर : व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ, कोमल आणि आरोग्यदायी ठेवतात.
हाडांचे आरोग्य सुधारते : व्हिटॅमिन के हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते. नाशपाती केव्हा खावे?
नाशपाती दिवसभरात कधीही खाल्ली तरी चालते, मात्र सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास तिचे सर्वाधिक फायदे मिळतात.
पावसाळ्यात सर्दी, ताप, पचनाचे विकार यापासून बचाव करण्यासाठी नाशपाती एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. आपल्या आहारात याचा नियमित समावेश केल्यास आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक मोठे पाऊल टाकता येते.