'विकसित कृषी संकल्प अभियाना'दरम्यान शेतकऱ्यांनी बियाणे व कीटकनाशके यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली होती.
त्यामुळे आता बियाणे आणि कीटकनाशके यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बुधवारी केली.
कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, कृषी मंत्रालय बनावट बियाणांबाबत काठोर कायदा करणार असून, या अंतर्गत गुन्ह्यांसाठी दंड कसा वाढवायचा यावर विचार करत आहे.
बियाणे कायदा, १९६६ मध्ये एक वर्षाच्या आत योग्य ते बदल केले जातील. तसेच बनावट कीटनाशकांची विक्री रोखण्यासाठी कीटनाशक कायदा, १९६८ मध्ये सुधारणा केल्या जातील.
◼️ ७२१ जिल्ह्यांच्या १.४३ लाख गावांतील १.३४ कोटी शेतकऱ्यांशी संपर्क साधला.
◼️ ८,२८० शास्त्रज्ञ आणि २,१७० पथके देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानात होती.
◼️ ६०,२८१ कार्यक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात आले होते.
प्रगतिशील शेतकऱ्यांना करणार लोकप्रिय
चौहान यांनी सांगितले की, आम्हाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सूचना मिळाल्या. कृषीविषयक योजना आणि धोरणे ठरवताना त्यांचा उपयोग केला जाईल. प्रगतिशील शेतकऱ्यांचे उपक्रम लोकप्रिय केले जातील.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची सक्ती
चौहान यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ आठवड्यातून तीन दिवस शेतकऱ्यांच्या शेतांना सक्त्तीने भेट देतील. मी आठवड्यातून दोन दिवस शेतकऱ्यांच्या शेतांवर जाईन. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा: कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर