Join us

Agriculture News : अन्न व पोषण अभियानांतर्गत 50 टक्के अनुदानावर बियाणे, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:12 IST

Agriculture News : शेतकऱ्यांना (Paddy Seed) सवलतीच्या दराने प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गडचिरोली  : अन्न आणि पोषण अभियानांतर्गत (Anna Poshan Abhiyan) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान आणि तूर पिकासाठी (Paddy Seed) सवलतीच्या दराने प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा गरजू व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा आधार होणार आहे.

या योजनेंतर्गत १० वर्षाच्या आत विकसित वाणांसाठी, तसेच १० वर्षांहून जुन्या वाणांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी प्रमाणित बियाण्यांचे लक्ष्य १० वर्षातील धान वाणासाठी ८७६ क्विंटल, १० वर्षावरील धान वाणासाठी ४३८ क्विंटल, १० वर्षांतील तूर वाणासाठी ३० क्विंटल आणि १० वर्षांवरील तूर वाणासाठी २० क्विंटल इतके निश्चित करण्यात आले आहे

जिल्ह्यातील विविध बियाणे वितरकांकडे सध्या १० वर्षांतील धान वाणाचे ७४७ क्विंटल, १० वर्षांवरील धान वाणाचे २९० क्विंटल, १० वर्षांतील तुर वाणाचे ५ क्विंटल आणि १० वर्षांवरील तुर वाणाचे ४ क्विंटल बियाणे उपलब्ध असून, जिल्ह्यातील १८ वितरकांकडे है बियाणे उपलब्ध आहे. या वितरकांची यादी कृषी विभागामार्फत लवकरच तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना भात पिकासाठी १० वर्षातील बियाण्यांवर प्रति क्विंटल २,००० रुपये आणि १० तपांवरील बियाण्यांवर १००० रुपये, तर तूर पिकासाठी १० वर्षांतील बियाण्यांवर प्रति क्विंटल ५,००० रुपये आणि १० वर्षावरील बियाण्यांवर २,५०० रुपये इतके अनुदान देय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

ही कागदपत्रे लागणारइच्छुक शेतकऱ्यांनी आपला ७/१२ उतारा, आधार कार्ड आणि फार्मर आयडीसह संबंधित बियाणे वितरकांशी संपर्क साधून सवलतीच्या दरात बियाणे घ्यावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

तेच ते पीक नको, दरवर्षी फेरपालट करावीअनेक शेतकरी दरवर्षी एकच पीक घेत राहतात. त्यामुळे पिकांना मातीतील आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नाहीत. यातून उत्पन्नात घट होते. त्यासाठी तेच ते पीक घेणे टाळावे व फेरपालट करावी, जेणेकरून उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांना फायदा होईल, असा सन्ना कृषी विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी दिला आहे.

आधी येणाऱ्यांना प्राधान्य लाभार्थी निवडीसाठी प्रथम वेणान्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाणे वितरण करण्यात येणार असून, प्रत्येक शेतकऱ्याला किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्राकरिता हा लाभमर्यादित आहे.

जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सवलतीत बियाणे देण्याच्या योजनांचा गरीब, तसेच गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. विशिष्ट बियाणांचा आग्रह धरू नये.- प्रिती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभातपेरणीलागवड, मशागत