Join us

Nuksan Bharpayee : शेतकऱ्यांना दिलासा! रब्बी बियाण्यांसाठी तब्बल ४ हजार कोटींचा मदतनिधी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:32 IST

Nuksan Bharpayee : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान सोसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लाखो शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. जमिनीच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र मदतनिधीची तरतूद करण्यात आली आहे. (Nuksan Bharpayee)

Nuksan Bharpayee : अतिवृष्टी, पुर आणि पिकांच्या नुकसानाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला होता. मात्र, राज्य शासनाकडून आता या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. (Nuksan Bharpayee)

रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी व बियाणांसाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाने मंजूर केला असून, याचा लाभ २९ लाखांहून अधिक बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Nuksan Bharpayee)

मराठवाड्यातील जिल्हानिहाय निधी वाटप

जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांना हा मदतनिधी देण्यात येणार आहे.

जिल्हाबाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हेक्टर)मदत (कोटी रुपये)
छत्रपती संभाजीनगर६,८८,३४५६,०८,९५६.७८६०८
हिंगोली२,९७,७०९३,४१,२८४.०६३४१
नांदेड७,८०,३२७७,२७,९३२.४०७२७
बीड७,३७,६१०७,०८,०८५.६६७०८
जालना६,२१,३८८४,६१,५१६.५८४६१
धाराशिव५,०६,६१४५,७७,५४४.६२५७७
लातूर५,१९,२७४५,६५,५८५.६८५६५
परभणी४,३९,२९७४,९५,११०.१९४९५

एकूण मदतनिधी : ४,०५१ कोटी रुपये

२९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत

राज्य शासनाने 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) यंत्रणेद्वारे २ हजार ८६ कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. ही मदत रब्बी हंगामातील पेरणी, बियाणे खरेदी आणि शेतमाल उत्पादन पुनर्संचयित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

३२ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान

मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भाजीपाला या पिकांवर मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने ही मदत योजना जलद गतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतजमिनीच्या नुकसानीसाठी स्वतंत्र निधी

अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचं नाही तर शेतजमिनींचंही मोठं नुकसान झालं आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र निधी मंजूर केला आहे.

जिल्हानुकसानभरपाई
छत्रपती संभाजीनगर६७ लाख रुपये
धाराशिव१० कोटी रुपये
हिंगोली६८ लाख रुपये
एकूण२४.६३ कोटी रुपये

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय

रब्बी हंगामातील उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पिकांची पुनर्पेरणी, बियाणे खरेदी आणि खत पुरवठा यासाठी शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळेल.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* मिळालेल्या निधीचा उपयोग योग्य वेळी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी करावा.

* प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा आणि हवामान अंदाज लक्षात घेऊन पेरणी नियोजन करावे.

* जमिनीच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

हे ही वाचा सविस्तर : e-KYC : ई-केवायसीसाठी टेकडीवर; नेटवर्कच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Farmers: ₹4,000 Crore Aid for Rabi Seeds Announced

Web Summary : The Maharashtra government has approved ₹4,000 crore to aid over 29 lakh farmers in Marathwada affected by heavy rains and floods. The funds will support Rabi season sowing and seed purchases, with direct transfers to farmers' accounts. Assistance is also allocated for damaged farmlands.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडा