Join us

Chemical Fertilizers : सेंद्रिय शेती हवी का रासायनिक शेती? खत वापरात पुन्हा वाढ! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:06 IST

Chemical Fertilizers : शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी खतं वापरतायत, पण यामागचा अतिरेक आता धोकादायक वळणावर आहे. राज्यात गेल्या वर्षी ७१ लाख टन रासायनिक खत शेतात मिसळले गेले. जमिनीच्या सुपीकतेवर गदा, आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसत आहे. (Chemical Fertilizers)

Chemical Fertilizers :राज्यात रासायनिक खतांचा वापर वर्षागणिक वाढत आहे. २०२४-२५ च्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगाम मिळून राज्यातील शेतकऱ्यांनी शेतात तब्बल ७१.७ लाख मे. टन. रासायनिक खत शेतात मिसळविले. यंदाच्या हंगामातही हा प्रकार कायम असून, यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे.(Chemical Fertilizers)

कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामिळून रासायनिक खतांचा एकूण वापर ६४.७३ लाख मेट्रिक टन इतका नोंदविला गेला.(Chemical Fertilizers)

२०२३-२४ मध्ये त्यात काही अंशी घसरण होऊन ६४.५७ लाख मे.टन खत वापरले गेले, तर २०२४-२५ मध्ये पुन्हा परिणामकारक वाढ होऊन हा आकडा ७१.०७ लाख मे. टनावर पोहोचला आहे.(Chemical Fertilizers)

२०२४-२५ हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी तब्बल ७१.०७ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती कृषी आयुक्तालयाच्या अहवालातून पुढे आली आहे.(Chemical Fertilizers)

२०२२-२३ मध्ये हा आकडा ६४.७३ लाख टन होता. त्यात २०२३-२४ मध्ये किंचित घट झाली होती, मात्र यंदा पुन्हा वाढ झाली असून ही सतत वाढती रासायनिक अवलंबित्वाची साखळी जमिनीच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी गंभीर ठरणारी आहे.(Chemical Fertilizers)

राज्यात रासायनिक खत वापराचे वाढते प्रमाण

आर्थिक वर्षखरीप हंगामरब्बी हंगामएकूण खत वापर
२०२२-२३३७.६७ लाख मे. टन२७.०६ लाख मे. टन६४.७३ लाख मे. टन
२०२३-२४४४.५६ लाख मे. टन२०.१० लाख मे. टन६४.५७ लाख मे. टन
२०२४-२५४४.०१ लाख मे. टन२७.०६ लाख मे. टन७१.०७ लाख मे. टन

उत्पादनवाढीसाठी केला जातो वापर

वर्षागणिक होत असलेली ही वाढ शेतातील उत्पादनवाढीसाठी केली जात असली तरी, सुपीक मातीचा पोत, सेंद्रिय घटक आणि शेताचे दीर्घकालीन आरोग्य धोक्यात येण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

शेतकऱ्यांनी मृद परीक्षण करून आवश्यक तितकेच रासायनिक खत वापरायला हवे. राज्य सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी जैविक पर्यायांवर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

हे ही वाचा सविस्तर :Sericulture Farming: कृषी उद्योगात क्रांती: तुती लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्धी! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखतेमहाराष्ट्र