Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारल्याप्रकरणी प्रशासनाने आता मोठा पाऊल उचलले आहे. तलाठी, ग्रामसेवकांनंतर थेट तहसीलदार व नायब तहसीलदारांपर्यंत चौकशीचा वेध पोहोचला आहे. (Anudan Vatap Ghotala)
१० अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याने जिल्हा प्रशासनात हालचालींना आता वेग आला आहे.(Anudan Vatap Ghotala)
जालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदान वाटपातील घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई होत आहे. प्राथमिक चौकशीत ८९ कर्मचारी दोषी आढळले असून, यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांचा समावेश आहे. (Anudan Vatap Ghotala)
या प्रकरणात आतापर्यंत दहा तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून, उर्वरित दोषी तलाठ्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.(Anudan Vatap Ghotala)
याप्रकरणी आता प्रशासनाची नजर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गेली असून, पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील हे अधिकारी सध्या कार्यरत किंवा पूर्वीच्या काळातील आहेत. (Anudan Vatap Ghotala)
या कारवाईची ठोस दिशा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिलेले संकेतांनंतर ठरली. त्यांनी घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे स्पष्ट सांगितले होते.(Anudan Vatap Ghotala)
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटीस बजावलेल्या दहा अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांनी आपले खुलासे प्रशासनाकडे सादर केले आहेत. उर्वरित आठ अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवण्यात आले आहेत. दरम्यान, तलाठ्यांवर कारवाईचा वेगही वाढवण्यात येत असून, येत्या काही दिवसांत आणखी काही निलंबने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहा तलाठ्यांचे निलंबन
अनुदान घोटाळ्यात ८९ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. यानंतर प्रशासनाने दोषी आढळलेल्या तलाठ्यांना नोटीस पाठवून खुलासे मागितले होते. समाधानकाकर खुलासे नसल्यामुळे प्रशासनाने दहा तलाठ्यांना निलंबित केले होते.
यानंतर उर्वरित तलाठ्यांच्या निलंबनाची कारवाई प्रशासनाकडून सुरू आहे. आज आणखी काही तलाठ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
अधिकारी रडारवर
अनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत अनुदान लाटण्यात आले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नव्हती.
मात्र, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दहा अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासे मागितले आहेत.
पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांचा समावेश आहे. अंबड-घनसावंगी तालुक्यातील सध्या कार्यरत असलेले, तसेच यापूर्वीच्या १० अधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आलेली आहे.
अनुदान वाटप घोटाळ्याशी संबंधित १० अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. यातील दोन जणांनी खुलासे सादर केलेले आहेत. तसेच आणखी काही तलाठ्यांचे निलंबन होणार आहे. - श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना