Join us

शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ; कोणत्या पिकाला किती दर? वाचा सविस्तर

By रविंद्र जाधव | Updated: May 28, 2025 19:42 IST

Kharif 2025 MSP Rate : नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वृद्धी केली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजर बियाणे) (प्रति क्विंटल ८२० रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) करण्याची शिफारस केली आहे.

२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी सर्व खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (प्रति क्विंटल रुपये)

अ.क्र.शेतमालकिमान आधारभूत किंमत (२०२५-२६)किमान आधारभूत किंमत (२०२४-२५)वाढ
१ भात (सामान्य)२३६९२३००६९ 
 भात (ग्रेड अ)२३८९२३२०६९ 
२ ज्वारी (हायब्रिड)३६९९३३७१३२८
 ज्वारी (मालदांडी)३७४९३४२१३२८ 
३ बाजरी २७७५२६२५१५० 
४ नाचणी४८८६४२९०५९६ 
५ मका२४००२२२५१७५ 
६ तूर ८०००७५५०४५० 
७ मूग ८७६८८६८२८६ 
८ उडीद ७८००७४००४०० 
९ भुईमूग ७२६३६७८३४८० 
१० सूर्यफूल (बियाणे)७७२१७२८०४४१ 
११ सोयाबीन पिवळा५३२८४८९२४३६ 
१२ तीळ९८४६९२६७५७९ 
१३ कारळे९५३७८७१७८२० 
१४ कापूस (मध्यम स्टेपल)७७१०७१२१५८९ 
 कापूस (लांब स्टेपल)८११०७५२१५८९ 

२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केलेली ही वाढ २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट किमान आधारभूत किमती निश्चित करण्याच्या घोषणेशी सुसंगत आहे.

बाजरी (६३%) आणि त्यानंतर मका (५९%), तूर (५९%) आणि उडीद (५३%) या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५०% जास्त नफा मिळण्याचा अंदाज आहे.

अलिकडच्या वर्षांत सरकार डाळी तसेच तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्रीअन्न यासारख्या धान्यांव्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला या पिकांसाठी जास्त किमान आधारभूत किमती देऊ करुन प्रोत्साहनही देत आहे.

तर २०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत ७६०८ लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत केवळ ४५९० लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली होती. याशिवाय २०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत १४ खरीप पिकांची ७१७८ लाख मेट्रिक टन खरेदी झाली तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ४६७९ लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली होती.

२०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या रुपात १४.१६ लाख कोटी रुपये देण्यात आले तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या रुपात ४.४४ लाख कोटी रुपये देण्यात आले होते.

२०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत १४ प्रकारची खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत १६.३५ लाख कोटी रुपये होती. तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत, शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत ४.७५ लाख कोटी रुपये होती इतकी होती.

हेही वाचा : शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीकशेतकरीमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळकेंद्र सरकार