खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असून, सर्वत्रच बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र आधीच अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावले गेल्याने अनेक शेतकऱ्यांकडे बी-बियाणे खरेदीसाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत.
त्यामुळे आता खरीप हंगामात शेतात मोती पिकविण्यासाठी अनेक शेतकरी हे सध्या सोनाराचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. शेतीसाठी सोने-चांदी आणि जवळच्या वस्तू गहाण ठेवण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमूळे सातत्याने अडचणीत सापडत असतो. ऐन पेरणीच्या तोंडावर पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
जवळ असलेले सोन्या-चांदीचे दागिने त्यांना द्यायचे आणि बी-बियाणे खरेदीसाठी त्यांच्याकडून विशिष्ट मुदतीकरिता कर्जस्वरूपात व्याजाने पैसे घ्यायचे, असे प्रकार सध्या दिसत आहेत. परंतु निसर्ग परिस्थितीवरच उसनवार देणी शेतकऱ्याला फेडावी लागतात.
बँक देते कर्ज
पीककर्जाची सुविधा बैंकांत आहे. बँकांकडून शेतकऱ्याऱ्यांना कर्जवाटप होत असते, मात्र कागदपत्रांअभावी कर्ज मिळण्यास वेळ लागतो. त्यामुळे बी-बियाणे खरेदी करायचे त्यावेळीच पैसे नसल्याने अडचण निर्माण होते.
वसईतील शेतकऱ्यांना सेवा सोसायटीचा आधार
• शेतकऱ्यांना खरीप पीक घेता यावे यासाठी तालुक्यात असलेल्या सहकारी सेवा सोसायटी बिनव्याजी कर्ज देते. त्यामुळे भात शेती करण्यासाठी शेतकऱ्याऱ्यांना आधार मिळतो.
• हजारो शेतकरी या सोसायटीच्या योजनेचा लाभ घेतात. पण काही शेतकरी हे बिनव्याजी कर्ज भरत नसल्याने सोसायटीला पीक कर्ज देण्यास अडचण निर्माण होते.
मोडीचा भाव काय?
शुद्ध सोन्याला (मोड काढून) ८५ ते २० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाते. गहाण ठेवलेल्या वस्तूवर ६० ते ७० टक्के इतकी रक्कम कर्जस्वरूपात दिली जाते. बहुतांश शेतकरी वस्तू गहाण ठेवूनच आपली अडचण भागवितात. अलीकडे सराफापेक्षा बँकेत सोने-चांदी गहाण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा पतसंस्थेमध्ये, खासगी बँकेत तत्काळ कर्ज मिळते.
सध्या सोने-चांदीला चांगला भाव आहे. खरेदी मोठी नसली तरी अनेकजण सोने-चांदीची मोड करण्यासाठी येत आहेत. त्यांना चांगला मोबदला मिळत आहे. - अमित जैन, सराफ.
माजी पिकाला या वर्षी भाव मिळाला नसल्यामुळे शेतकन्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. बऱ्याच वेळा केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना, शेती पडीक पडू नये म्हणून सोने गहाण ठेवून शेती करावी लागणार आहे. - विलास पाटील, शेतकरी, पारोळ ता. वसई जि. पालघर
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती