पंढरपूर: आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना श्री देव विठ्ठलाचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी २७ जूनपासून २४ तास दर्शनव्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शुद्ध आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे.
यात्रेचा कालावधी २६ जून ते १० जुलै असा आहे. श्रीविठ्ठलाची शासकीय महापुजा २:२० वाजता मुख्यमंत्री, राज्य व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक केली जाणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे.
दर्शनरांगेत बॅरिकेडिंग करून वॉटरप्रुफ मंडप, ४ बाय ६ पत्राशेड विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाइव्ह दर्शन, कुलर, फॅन, सार्वजनिक सूचनाप्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षारक्षक नियुक्ती, आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच चहा-खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, २४ तास अन्नछत्र, बॅग स्कॅनर मशीन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम, इत्यादी स्वरूपाच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांना निमंत्रणप्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देणे, टोकन दर्शनाची चाचणी घेणे, इत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण १६ किंवा १७ जून रोजी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणीचंदनउटी पूजेची १३ जून रोजी सांगता पूजा होणार आहे. तसेच टोकन दर्शन प्रणालीची १५ जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
अधिक वाचा: Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?