भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि तिच्याशी संबंधित पूरक व्यवसायांवर आधारित आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा पूरक व्यवसायांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मत्स्यपालन हा एक फायदेशीर, कमी कालावधीत परतावा देणारा आणि पोषण सुरक्षेसाठी उपयुक्त व्यवसाय ठरतो.
मासे हे प्रथिनांचा स्वस्त आणि सहज उपलब्ध स्रोत आहेत. सध्याच्या घडीला जगातील सुमारे १७% लोकसंख्येच्या प्रथिनांची गरज मासेमारी व मत्स्यपालन यांच्याद्वारे भागवली जाते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश आहे आणि मत्स्यपालन हे आता देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.
भारत व महाराष्ट्रातील मत्स्यपालनाची स्थिती
भारतामध्ये एकूण मासे उत्पादनापैकी सुमारे ६५% हिस्सा अंतर्गत जलस्रोतांतून (तळी, तलाव, नद्या इ.) मिळतो, तर उर्वरित ३५% उत्पादन सागरी मत्स्यपालनातून होते.
२०२३–२४ मध्ये भारताचे एकूण मासे उत्पादन : अंदाजे १७ दशलक्ष टन
जागतिक क्रमवारी : चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर
निर्यात मूल्य : वर्षाला सुमारे ₹६५,००० कोटींपर्यंत
प्रमुख राज्यांतील उत्पादनाचा आढावा (२०२३–२४)
प्रकार | उत्पादन (टन) | टक्केवारी | प्रमुख राज्ये |
---|---|---|---|
अंतर्गत जलस्रोत | ११ दशलक्ष | ६५% | आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र |
सागरी मत्स्यपालन | ६ दशलक्ष | ३५% | गुजरात, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू |
एकूण | १७ दशलक्ष | १००% | - |
मत्स्यपालनाचे प्रकार
तळे आधारित मत्स्यपालन – शेततळी, तलाव, बंधाऱ्यांमध्ये
पिंजरा पद्धत (Cage Culture) – मोठ्या पाणवठ्यात लोखंडी/प्लास्टिक पिंजऱ्यांमध्ये मासे
रेसवे पद्धत (Raceway Culture) – वाहत्या पाण्यात जलद गतीने मासे वाढवणे
बायोफ्लॉक तंत्रज्ञान (Biofloc Technology) – अल्प पाण्यात जास्त उत्पादन
इंटिग्रेटेड मत्स्यपालन – भात, भाजीपाला किंवा बदक पालनासोबत
उपयुक्त प्रजाती व त्यांची उत्पादनक्षमता
गोड्या पाण्यातील मासे : रोहू, कतला, मृगाळ, कॉमन कार्प, सिल्वर कार्प
खाऱ्या पाण्यातील मासे : सुरमई, पाँफ्रेट, बांगडा, झिंगा, खेकडे
उच्च बाजारमूल्याचे मासे : पंगासियस, तिलापिया, ट्राउट
प्रजाती | वाढीचा कालावधी | सरासरी उत्पादन (टन/हे.) | बाजारभाव ₹/किलो |
---|---|---|---|
रोहू | ८–१० महिने | २.५–३ टन | ₹१५०–१८० |
कतला | ८–१२ महिने | ३–४ टन | ₹१४०–१६० |
कॉमन कार्प | ६–८ महिने | २ टन | ₹१००–१२० |
पंगासियस | ६–७ महिने | ५–६ टन | ₹१००–१३० |
तिलापिया | ५–६ महिने | ४–५ टन | ₹१२०–१५० |
आधुनिक तंत्रज्ञानाची साथ
• बायोफ्लॉक तंत्रज्ञान – कमी जागेत व पाण्यात उच्च उत्पादन
• RAS (Recirculating Aquaculture System) – पाण्याचा पुनर्वापर करून शाश्वत शेती
• एरिएशन सिस्टम – ऑक्सिजनचा पुरवठा सुधारून जलचरांची वाढ
• कृत्रिम आहार – वैज्ञानिकदृष्ट्या पोषणयुक्त खाद्य
• डिजिटल अॅप्स – पाणी गुणवत्ता, बाजारभाव व व्यवस्थापन नियंत्रण
मत्स्यपालनाचे फायदे
• कमी कालावधीत अधिक उत्पन्न
• अल्प जागेत अधिक उत्पादन
• प्रथिनयुक्त पोषण सुरक्षा
• निर्यातीमधून परकीय चलन
• ग्रामीण युवक व महिलांसाठी रोजगार संधी
समोरील आव्हाने
समस्या | उपाययोजना |
---|---|
पाण्याची मर्यादित उपलब्धता | जलसंधारण व पुनर्वापर पद्धतींचा अवलंब |
रोगराई व संसर्ग | प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण व नियमित तपासणी |
बाजारभावातील अस्थिरता | थेट ग्राहक विक्री, सहकारी बाजार समित्या |
थंड साखळी अभाव | कोल्ड स्टोरेज, रेफ्रिजरेटेड वाहने यांची गरज |
तंत्रज्ञानाची माहिती कमी | प्रशिक्षण शिबिरे, सरकारी योजनांमार्फत मार्गदर्शन |
शासकीय योजनांचा लाभ
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत अनुदान
सहकारी संस्था व खाजगी भागीदारीचे प्रोत्साहन
प्रशिक्षण शिबिरे व प्रात्यक्षिक प्रकल्प
संशोधन व विकासासाठी गुंतवणूक
थंड साखळी व प्रक्रिया सुविधा निर्माण
ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील प्रभाव
मत्स्यपालनामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळाले आहेत. यामुळे रोजगारनिर्मिती, महिलांचा आर्थिक सहभाग, पोषण सुरक्षा आणि निर्यातीतून परकीय चलन प्राप्ती हे फायदे देशाच्या ग्रामीण आर्थिक रचनेत स्पष्टपणे दिसून येतात.
बाब | परिणाम |
---|---|
शेतकरी उत्पन्न | ३०–४०% वाढ |
रोजगार निर्मिती | ग्रामीण युवक व महिलांसाठी संधी |
पोषण सुरक्षा | स्वस्त प्रथिनांचा उपलब्ध स्रोत |
निर्यात | ₹६५,००० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न |
मत्स्यपालन हा आज केवळ एक पूरक व्यवसाय न राहता, ग्रामीण भारताचा आधारस्तंभ ठरला आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास शेतकरी स्वतःचे उत्पन्न वाढवू शकतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा उचलू शकतो.
उद्योग, पोषण आणि रोजगार यांचा मिलाफ असलेला मत्स्यपालन व्यवसाय भविष्यातील शाश्वत ग्रामीण विकासाचा मार्ग ठरू शकतो.
डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहाय्यक प्राध्यापक,एमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ संभाजीनगर.
हेही वाचा : "मायक्रोग्रीन्स'' घरच्या घरी उगवता येणारी सुपरफूड पालेभाजी
Web Summary : Fish farming boosts rural incomes, provides nutrition, and generates employment. India is a major fish producer, with significant inland and marine production. Modern technologies and government schemes further enhance its potential for sustainable rural development.
Web Summary : मछली पालन ग्रामीण आय को बढ़ाता है, पोषण प्रदान करता है और रोजगार पैदा करता है। भारत एक प्रमुख मछली उत्पादक देश है, जिसमें महत्वपूर्ण अंतर्देशीय और समुद्री उत्पादन होता है। आधुनिक प्रौद्योगिकियां और सरकारी योजनाएं ग्रामीण विकास के लिए इसकी क्षमता को और बढ़ाती हैं।