रमेश वारकेबोरवडे : कागल तालुक्यातील बोरवडे गावची 'बैलांचं गाव' अशी ओळख होती. परिसरातील शेतकरी बोरवडेतील शेतकऱ्यांची बैलजोडी पाहण्यासाठी येत होते.
परिसरातील एखाद्या शेतकऱ्याला बैल खरेदी करायचा असेल तर तो बोरवडेला भेट देत होता. बिद्री साखर कारखाना जवळच असल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी आणि शेतीसाठी गावातील शेतकऱ्यांना बैल पाळण्याची मोठी हौस होती.
यांत्रिकीकरणामुळे बोरवडेतील शेतकऱ्यांकडे केवळ २४ बैलच पाहायला मिळतात. कुटुंबातील सदस्याप्रमाणे शेतकरी बैलावर प्रेम करतो. शेतकरी आणि बैलाचे नाते हृदयशील असते.
याच हृदयशील नात्यातून बोरवडेत अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी बैल बाळगण्याची आवड होती. ऊस वाहतुकीतून शेतकऱ्यांचे अर्थाजन व्हायचे.
परंतू आता गावातील बैलांचे प्रमाण कमी झाले. टॅक्क्टर, पॉवर टीलर याचे वाढते प्रमाण तसेच बैल सांभाळण्यासाठी येणारा खर्च यामुळे संख्या कमी झाली आहे.
दिवसभर बैलाच्या मदतीने काम करूनही शेती कामासाठी योग्य दर मिळत नाही. सध्या बैलांच्या किमती ८० हजार ते एक लाखाच्या दरम्यान असून, या किमती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. शिवाय त्यांची देखभाल, वैरण खर्चिक आहे. माझ्या घरी आजही परंपरेनुसार शेती कामासाठी आणि बैलांची आवड म्हणून बैलजोडी आहे. - पांडुरंग साठे, शेतकरी, बोरवडे
अधिक वाचा: जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर