राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘मुंबई’ ठरली सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:21 AM2018-05-17T06:21:27+5:302018-05-17T06:21:27+5:30

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई पालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.

'Mumbai' was among the best in the states' states | राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘मुंबई’ ठरली सर्वोत्तम

राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘मुंबई’ ठरली सर्वोत्तम

मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई पालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा झाली. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार मुंबई पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियनाच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत अनेक बाबी चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्या. मुंबईसारख्या महानगरात स्वच्छता अभियान राबविताना सर्वस्तरीय प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने व सातत्याने करण्यात आले.
२०१५ मध्ये पालिका क्षेत्रातून दररोज ९ हजार ५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात येत होता. याबाबत पालिकेने राबविलेल्या उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य, यामुळे कचऱ्याचे हे प्रमाण आता दररोज ७ हजार १०० मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे. पालिकेच्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचºयापासून खत, जनजागृती, प्रदर्शने यासरख्या बाबींचा समावेश होता. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यावर भर देण्यात आला. पूर्वी ३ हजार ३१४ सार्वजनिक ठिकाणी असणाºया कचरा संकलन केंद्रांची संख्या आता ९४१ पर्यंत खाली आली आहे. पालिकेच्या विविध उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये इत्यादी १ हजार २६ ठिकाणी ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले. २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचा भूखंड असणाºया सोसायट्या/इमारती किंवा दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा तयार होतो, अशा सोसायट्या वा रेस्टॉरंट अथवा मॉल इत्यादींना त्यांच्या स्तरावर कचºयापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. याचाही सकारात्मक परिणाम कचरा कमी होण्यावर झाला.
>जनजागृतीसाठी प्रदर्शनांचे आयोजन
झोपडपट्टी परिसर, चाळी, गावठाणे, छोट्या इमारती इत्यादींमध्ये जनजागृती करण्यात येऊन, तेथेदेखील कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले. कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, या दृष्टीने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले.महापालिका क्षेत्रासाठी मध्यवर्ती जनजागृती प्रदर्शन वरळी परिसरातील एन.एस.सी.आय. येथे भरविण्यात आले. कचºया संदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी अ‍ॅप सुरु करण्यात आले. स्वच्छता विषयक जाणीव जागृतीसाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये स्वतंत्रपणे मदत कक्ष व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले.१ हजार ६९० सामुदायिक शौचालये, ८९८ पे अँड यूज टॉयलेट्स आणि १ हजार ९४१ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. उघड्यावरील हागणदारी आढळून आलेल्या ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली.वर्षभरात ९४० शौचकुपे असलेली फिरती शौचालये उपलब्ध करून दिली. उघड्यावरील हागणदारी असणाºया परिसरात जनजागृतीसाठी पहाटे ४पासून गुडमॉर्निंग पथके कार्यरत करण्यात आली. सार्वजनिक शौचालयांबाबत नागरिकांनादेखील त्यांची प्रतिक्रिया नोंदविण्यात यावी, यासाठी अनेक सार्वजनिक शौचालयात टॉयलेट रेटिंग मशिन बसविण्यात आले.सार्वजनिक शौचालये शोधणे सोपे होण्याच्या दृष्टीने अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले. पालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालये, पेट्रोल पंप परिसरातील शौचालये, रेल्वे स्थानक /बसस्थानाकांजवळील शौचालये इत्यादी ठिकाणे गुगल मॅपवर दर्शविण्यात आली.

Web Title: 'Mumbai' was among the best in the states' states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.