Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 02:40 PM2020-01-09T14:40:22+5:302020-01-09T14:41:50+5:30

Lokmat Sarpanch Awards: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीदेखील

Lokmat Sarpanch Awards: Silence is secretly all the worse, Nawab Malik calls to devendra Fadnavis on raj thackeray | Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला

Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याबाबत लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. त्यावर, कामगारमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. गुपचूप काहीही केलं तर त्यातून वाईटच घडतं, असे मलिक यांनी म्हटले. मलिक यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.  

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीदेखील मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकतात, असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजपा-मनसे युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडले. राज ठाकरेंसोबत बैठक झाली का? याबद्दल बोलताना आमच्यात अनेकवेळा भेटा झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पण, मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचे आजतरी कुठलिही चिन्ह नाहीत. मनसेच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे. मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू, पण आजतरी ही शक्यता वाटत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या आघाडीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यावरुन नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोला लगावला.

राज ठाकरेंसोबत गुप्त बैठक झाली का? देवेंद्र फडणवीसांचे 'मनसे' उत्तर

राज ठाकरेंसोबत बैठक झाली की नाही, यावर ते होकार देत नाहीत. राणेसाहेबांना या पद्धतीने ते भेटलो होते, त्यांचं त्यांनी काय केलं हे लोकांनी पाहिलेलं आहे. नारायण राणेंना गुजरातला गुपचूप घेऊन गेले होते. पण, गुपचूप गुपचूप जे घडतं त्यातून वाईटच होत, चांगलं काही होत नाही, असे म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्रांना टोला लगावला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही हातमिळवणी करत भाजपाने सत्ता स्थापन केली होती. तर, हा शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रमही गुपचूप गुपचूपच झाला होता. नवाब मलिक यांनी यावेळी एक शायरीही म्हटली. 

दुश्मनी जम के करो मगर जब कभी 
दोस्त बन जाए तब शर्मिंदा ना हो 

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे. 

 

Web Title: Lokmat Sarpanch Awards: Silence is secretly all the worse, Nawab Malik calls to devendra Fadnavis on raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.