Join us  

लाल वादळ मुंबईच्या वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 4:48 PM

1 / 6
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला.
2 / 6
समदु:खाने पोळलेल्या पालघर, ठाणे, अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्य़ांतील सुमारे तीस हजार शेतीधारकांचा जथ्था गेल्या पाच दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी तळपत्या उन्हात यात्रासंघर्ष करीत आहे.
3 / 6
१२ मार्चला विधानभवनाला घेराव घालून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारला साकडे घालणार आहे.
4 / 6
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दाखल झालेले शेतकरी गटागटाने या मोर्चाचे नियोजन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या गटप्रमुखांकडून रात्री पुढच्या प्रवासाच्या सूचना दिल्या जात आहेत.
5 / 6
पहाटे पाच वाजता मुक्काम स्थळावरून मुंबईच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात केल्यावर तब्बल तीस ते पस्तीस किमी अंतर पार केल्यावर हजारो शेतकऱ्यांचा ताफा भोजनासाठी निश्चितस्थळी थांबतो.
6 / 6
प्रत्येकाच्या आर्थिक वकुबानुसार शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच शिधा, सरपण जमा केले आहे. गेले पाच दिवस खिचडी, डाळ-भात असे साधे जेवण करून हा जथा मुंबईच्या दिशेने निघाला आहेत.
टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरी