Join us  

शेतकरी मोर्चासाठी शिवारातून शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:33 AM

1 / 8
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च अखेर सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला.
2 / 8
या लाँग मार्चमध्ये तब्बल 40 हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे.
3 / 8
6 मार्चला नाशिकहून निघालेला हा मोर्चा 166 किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोहोचला आहे.
4 / 8
रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले.
5 / 8
शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच केल्याने सरकारला गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच धडकी भरली आहे.
6 / 8
सरकार खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे.
7 / 8
सरकारचे शिष्टमंडळ आणि अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधींची दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे.
8 / 8
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च अखेर सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला.
टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी