'अटल सेतू'वर बंदी असतानाही घुसली रिक्षा; जाणून घ्या येथील प्रवासाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 03:46 PM2024-01-17T15:46:26+5:302024-01-17T15:57:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला आहे.

देशातील सर्वात लांब नाही, तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात मोठा पूल आहे. या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमही आहे.

हा पूल बनवण्यासाठी मोठ्या ऑर्थॉट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पूल उभारण्यासाठी जास्त खांबाची गरज भासली नाही. भारतात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे.

या पुलाची एकूण लांबी २१.८ किमी असून, त्याचा १६.५ किमीचा भाग समुद्र आणि ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. हा पूल समुद्राच्या तळापासून १५ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे.

देशातील सर्वात लांब सागरी मार्ग असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि रहदारीचा विचार करुन येथील प्रवासासाठी काही अटी व नियम लावण्यात आले आहेत.

या पुलावरुन मोटरबाईक, मोपेड, थ्री-व्हीलर टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर तसंच धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नाही. बैलगाडीलाही परवानगी नाही.

मात्र, या पुलावरुन रिक्षा धावताना दिसली असून त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोनंतर अटल सेतूवरील प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात.

या पुलाचा वापर केल्यास एकावेळी ५०० रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पण पुलावरुन प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे.

जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर २५० रुपये भरावे लागतील. पण रिटर्नचाही काढला तर ३७५ रुपये होतील.