२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:00 IST
1 / 7मुंबईसह उपनगरांमध्ये २६ जुलै २००५ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. एकट्या सांताक्रुझच्या हवामान केंद्रात चोविस तासांत ९४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 2 / 7त्यावेळी मुंबईसह मिरा भाईंदर-कल्याण, अंबरनाथ-बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. 3 / 7या पावसात ४०० हून अधिकांचा मृत्यू झाला होता तर हजारो वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. तर १४,००० हून अधिक घरांचंही नुकसान झालं होतं. 4 / 7२६ जुलै २००५ च्या महापुराला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते.5 / 7मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. साचल्या पाण्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती.6 / 7या दिवशी अनेकांचा मृत्यू झाला होता तर ५०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झाले होते.7 / 7दरम्यान, या घटनेला इतकी वर्षे उलटूनही महापालिकेनं अजून पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी आजही पाणी साठते.