राज्यात होणाऱ्या 8000 पोलिस भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा--गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:17 PM2020-02-13T23:17:02+5:302020-02-13T23:17:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राजसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते या मान्यवर मंत्री महोदयांचा शाल, पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Youth should benefit from 8,000 police recruitment in the state - Home Minister Anil Deshmukh | राज्यात होणाऱ्या 8000 पोलिस भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा--गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात होणाऱ्या 8000 पोलिस भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा--गृहमंत्री अनिल देशमुख

Next

मनोहर कुंभेजकर
मुंबई : गेल्या सरकारने राज्यात नव्या पोलिसांची भरती केली नव्हती. मात्र महाआघाडीने सरकारने राज्यात 8000 पोलिसांची नवी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रात्री जोगेश्वरीत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन जोगेश्वरी पश्चिम एस.व्ही.रोड येथील 24 कॅरेट चित्रपट गृहा समोरील मैदानावर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राजसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते या मान्यवर मंत्री महोदयांचा शाल, पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, महिला व सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र करतांना म्हणाले की, आज राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे काही मुंगेरीलाल राज्यात त्यांचे सरकार येण्याचे स्वप्न बघत आहे. मात्र त्यांचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,प्रफुल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा व राज्यसभेत सीएए,एनआरसी कायद्या विरोधात भूमिका घेतली.महाराष्ट्रात देखिल या कायद्यांना जोरदार विरोध झाला. महाराष्ट्रात मुंबईत 145 आंदोलने शांततेत झाली अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या या कायद्यांमुळे महाराष्ट्रातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही, असे ठोस आश्वासन गृहमंत्र्यांनी यावेळी दिले. गेल्या 29 जानेवारी रोजी भारत बंद असतांना वर्सोवा विधानसभेतील मानवी साखळी करून शांततेत सीएए,एनआरसी कायद्या विरोध करणाऱ्या 200 निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे या नरेंद्र वर्मा यांनी केलेल्या मागणी आपण निश्चित न्याय देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,सीएए,एनआरसी कायद्याला आम्ही संसदेत जोरदार विरोध केला.या कायद्यामुळे मोदी सरकार जाती धर्माच्या नावावर देशाचे 1950 साली पंडित जवाहरलाल नेहरू,मौलाना आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सरदार पटेल यांनी तयार केलेले देशाचे संविधानावर घाला घालण्याचा त्यांची कुटील निती असल्याची टीका त्यांनी केली.आज शरद पवार यांचा महा आघाडीचा प्रयोग देशात यशस्वी झाल्यावर भजपाची देशातील हुकमत संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याच्या बरोबर असून त्यांच्या हिताचे रक्षण करण्यास सज्ज आहे.देशाची लोकसंख्या 130 कोटी असून अल्पसंख्यक बांधवांची संख्या 15 टक्के आहे.त्यांना विकासाच्या नव्या प्रवाहात आणण्याची गरज असून यासाठी आमचा पक्ष ठोस प्रयत्न करेल असे आश्वासन त्यानी दिले.गेली 35 वर्षे माझे व नरेंद्र वर्मा यांचे जवळचे संबंध आहे.पक्षात विविध पदांवर काम करतांना त्यांनी एक जोश आणला आहे.जनतेचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या नरेंद्र वर्मा यांचा मुक्तकंठाने त्यांनी स्तुती केली.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की,भाजपाच्या हातून झारखंड आता दिल्लीत त्यांचा दारुण पराभव झाला.देशविरोधी काम भाजपा करत आहे.मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेची जबाबदारी स्वीकारली असून राज्यात कोणावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असे नवाब मलिक म्हणाले.

आपल्या प्रस्ताविज भाषणात नरेंद्र वर्मा यांनी गेल्या 130 वर्षांची परंपरा असलेल्या आणि मुंबईत रोज 5 लाख नागरिकांना डबे पोहचवणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांसाठी मुंबईत भूखंड देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्याकडे केली.

यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सुरेखा पेडणेकर,अल्पना पेंटर,पालिकेतील गटनेत्या राखी जधाव,अजित रावराणे,हरीश सणस,सोहेल सुभेदार,प्रभाकर चाळके,अमृता साळवी,नितीन कदम तसेच माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त ए.ए.खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Youth should benefit from 8,000 police recruitment in the state - Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.