५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केव्हा, भाजपचे नगरसेवक पुन्हा महासभेत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:48 PM2020-09-18T16:48:01+5:302020-09-18T16:49:21+5:30

ठाणेकर नागरीकांना ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊन दिलासा द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर झोपडपटटी भागातील नागरीकांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कॉंग्रेसने लावून धरली.

When tax exemption for 500 square feet houses, BJP corporators again aggressive in the general body meeting | ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केव्हा, भाजपचे नगरसेवक पुन्हा महासभेत आक्रमक

५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केव्हा, भाजपचे नगरसेवक पुन्हा महासभेत आक्रमक

Next

ठाणे : गुरुवारी ठाण्यात भाजपच्या वतीने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी केव्हा असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत देखील ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. ठाणेकरांना करमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. तर कॉंग्रेसने किमान झोपडपटटी भागात राहणाऱ्या तसेच दारीद्रय रेषेखालील नागरीकांना किमान तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी केली.
               मागील काही दिवसापासून ठाण्यात शिवसेनेला त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल असे वचन दिले होते. त्याचीच आठवण भाजप आणि मनसेकडून करुन दिली जात आहे. गुरुवारी याच मुद्यावरुन मनसेने आंदोलन केले होते. तर भाजपने शहरभर बॅनर लावून शिवेसनेला या वचनाची आठवण करुन दिली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण आदींसह इतर नगरसेवकांनी देखील सत्ताधारी शिवसेनेला या मुद्यावरुन घेरत ठाणेकरांना ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी द्यावी अशी मागणी लावून धरली. परंतु यावर शिवसेनेकडून काहीच उत्तर मिळाले नाही. दुसरीकडे निवडणुकीत शिवसेनेने काय वचन दिले होते, ते आम्हाला माहित नाही. परंतु कोरोनामुळे अनेकांच्या हाल झालेले आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, नोकºया गेल्या, पगार कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. त्यामुळे झोपडपटटी भागात राहणाºया किंवा दारीद्रय रेषेखालील नागरीकांना तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली.
त्यांची हीच मागणी लावून धरीत तीन महिने नाही तर किमान पाच महिन्यांचे मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर आणि मालती पाटील यांनी केली. परंतु यावर योग्य असे उत्तर न मिळाल्याने मध्येच हा विषय थांबला गेला.
 

Web Title: When tax exemption for 500 square feet houses, BJP corporators again aggressive in the general body meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.