पालघरात १२ इमारती धोक्याच्या छायेत
By Admin | Updated: May 16, 2014 02:17 IST2014-05-16T02:17:20+5:302014-05-16T02:17:20+5:30
नगरपरिषदेने शहरातील बारा इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.

पालघरात १२ इमारती धोक्याच्या छायेत
हितेन नाईक, पालघर - नगरपरिषदेने शहरातील बारा इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी नगरपरिषद इमारत शेजारीच असलेल्या धोकादायक इमारतींखाली दररोज खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक व एसटी बसची वाट पाहणारे शेकडो प्रवासी उभे असतात. त्यामुळे ही इमारत तत्काळ जमीनदोस्त न केल्यास मोठ्याप्रमाणात जीवितहानीला सामोरे जाण्याची पाळी ओढवू शकते. पालघर नगरपरिषदेने शहरातील रफीक लुलानीया (सरकारी दावाखान्यावजवळ), दामू पाटील चाळ/विमल दामनिया (पंचायत समितीजवळ), अध्यक्ष झटकल विला इमारत, शांतीलाल/प्रवीण जैन (सरकारी दावाखान्याजवळ), जलाराम टी हाऊस (स्टेशनजवळ), नॅशनल ज्वेलर्स-सागरमल जैन (स्टेशनजवळ), नाकोडा कलेक्शन-रामचंद्र तोरणी (स्टेशनजवळ), शकुंतला शा.मिश्रा (वजळीपाडा), विजय फरसाण मार्ट (स्टेशनजवळ), डॉ.एस.पी.जैन व श्याम ओसवाल (स्टेशनजवळ), बिसमिल्लाह कॅटरेस-अल्लाउद्दीन खान (कचेरीरोड) व शांतीलाल जैन (राज टॉकीजजवळ) इत्यादी बारा धोकादायक असलेल्या इमारती मालकांना पालघर नगरपरिषदेने नोटिसी बजावल्या आहेत. महाराष्टÑ नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियमानुसार वरील इमारतीमध्ये वास्तव्य करणारे मालक - भोगवटाधारक व वाणिज्य वापर करणार्यांनी याच इमारतींचा वापर तात्काळ थांबवून इमारतीचे बांधकाम बिनाविलंब तोडून टाकण्यासंबंधी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नोटिसी बजावल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून नोटिसी बजावूनही यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने इमारत बांधकाम कोसळल्यास होणार्या नुकसानीला फक्त मालक व इतर सर्वस्वी जबाबदार असल्याचेही कळविण्यात आले आहे, मात्र या धोकादायक इमारतींमध्ये अनेक वर्षांपासून राहणारी कुटुंबे व गाळेधारक ताबा सोडण्यास तयार होत नसल्याने यांच्यातील वादाचा फटका इतरांना बसू शकतो.