Join us  

शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:29 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे'हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण' 'समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली''शिवरायांच्या भव्य स्मारकाचा खोळंबा झाला काय?'

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ''जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!''  सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अंतराळातूनही दिसतो त्यामुळे मोदीभक्त खूश आहेत. सरदार पटेल यांच्या कार्याची उंची भक्तांपेक्षा मोठी आहे.- पटेलांचा पुतळा अंतराळातून दिसतो म्हणून पटेल मोठे नाहीत, पटेलांसारखे मोठे कार्य करून दाखवणे हीच पटेलांची उंची मोजण्याची ‘मोजपट्टी’ ठरली असती.- ‘‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. - शिवरायांच्या भव्य स्मारकाची अद्याप पायाभरणी झाली नाही याची खंत कुणाला वाटते काय? सरदारांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा आधी व्हावा व त्यांच्या समोर शिवरायांसारखे युगपुरुषही खुजे ठरावेत अशी एखादी अंतस्थ योजना होती काय व त्यानुसारच शिवरायांच्या भव्य स्मारकाचा खोळंबा झाला काय अशी शंका घेण्यास वाव आहे. - शिवरायांचा पुतळा हा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा भारी व जास्त उंचीचाच व्हायला हवा व त्यासाठी फक्त फडणवीस  सरकारने नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी एकत्र यायला हवे.  - पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे व त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे. - महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी चिंतामणराव देशमुख यांनी नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकला. ‘‘तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे’’ असे ठणकावून देशमुख संसदेच्या बाहेर पडले. त्या क्षणी चिंतामणराव देशमुख महाराष्ट्राचे कंठमणी झाले.  

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस