Join us  

ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:58 AM

ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.

मुंबई : ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येत आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली.मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांतून केला जातो. यातील १५० दशलक्ष लीटर पाणीठाणे-भिवंडीला दिले जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम २८८ नुसार हा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पाणीपुरवठ्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.सध्या ठाणे पालिका क्षेत्राला आवश्यक असणारे ७०० दशलक्ष लीटर पाणी एमआयडीसीकडून पुरविण्यात येते. यामध्ये मुंबई पालिकेकडून दररोजी १५० दशलक्ष लीटर पाणी मिळत असल्यामुळे ठाणेकरांची पाण्याची मोठी गरज भागते. महापालिका हद्दीतील दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे पालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही सुधारणा करण्यात आली आहे.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिकाठाणे महानगरपालिकामुंबईठाणे