सिंग यांचा आरोप अमान्य; आॅपरेशन एन्काउंटर अस्सलच असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

By Admin | Updated: August 25, 2015 02:43 IST2015-08-25T02:43:22+5:302015-08-25T02:43:22+5:30

डॉन दाऊद इब्राहीमला संपविण्यासाठी छोटा राजनच्या माणसांना ‘तयार’ करण्यात आले होते. ही कारवाई (आॅपरेशन) गुप्तपणे होणार होती परंतु मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी

Singh's charge is invalid; Mumbai police claim that the Operation Encounter is genuine | सिंग यांचा आरोप अमान्य; आॅपरेशन एन्काउंटर अस्सलच असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

सिंग यांचा आरोप अमान्य; आॅपरेशन एन्काउंटर अस्सलच असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
डॉन दाऊद इब्राहीमला संपविण्यासाठी छोटा राजनच्या माणसांना ‘तयार’ करण्यात आले होते. ही कारवाई (आॅपरेशन) गुप्तपणे होणार होती परंतु मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी याच माणसांना अटक केल्यामुळे ही योजना फसली, हा माजी गृहसचिव आर. के. सिंग यांचा दावा मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान्य नाही.
या संदर्भात दोन घटनांचा उल्लेख केला जातो. एक म्हणजे १९९८ ची. यावर्षी छोटा राजनचा विश्वासू साथीदार एन्काउंटरमध्ये थोडक्यात बचावला. दुसरी घटना २००५ मधील. तीत छोटा राजनच्या आणखी एका विश्वासू साथीदाराला अटक झाली. सिंग यांच्या त्या दाव्यानंतर या दोन घटना प्रकाशझोतात आल्या आहेत.
१६ नोव्हेंबर १९९८ रोजी बिग फार्मास्युटिकल कंपनीबाहेर झालेल्या त्या एन्काऊंटरमध्ये छोटा राजनचे चार साथीदार ठार मारले गेले व राजनचा खूप जवळचा समजला जाणारा व त्याचा कारभार तुरुंगातूनही चालविणारा जिवंत राहिला. या एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की दाऊदच्या विरोधात वापरण्यासाठी त्या लोकांना इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) जोपासले असल्याचे त्यावेळी समजले जात होते. तथापि, ते लोक दहशतवादी ऐहतेशामला खटल्यांची सुनावणी होत असलेल्या न्यायालयात हजर करण्यात येणार होते म्हणून तिकडे गेल्याची आमची माहिती होती.
ऐहतेशाम त्या पाच जणांच्या निशाण्यावर होता परंतु ते तसे काही करू न शकल्यामुळे त्यांनी पाच वाजता न्यायालय सोडले. मग आम्ही त्यांचा पाठलाग केला. जेव्हा त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही गोळीबार केला व त्यात चार जण ठार झाले. पाचवा वाचला तो इतरांच्या शरिराखाली पडल्यामुळे.
दाऊदच्या ठिकाणांची माहिती तो द्यायचा. आयबीने त्याला वापरले असेलही परंतु मुंबई पोलिसांनी केलेली कारवाईदेखील अस्सल होती कारण तो आम्हाला अनेक प्रकरणात हवा होता, असे हा अधिकारी म्हणाला.

हे एन्काऊंटर होण्याच्या आधी दोन महिने हे पाच जण मुंबईतील १८-२० संख्येतील खुनांंमध्ये सहभागी होते, असेही हा अधिकारी म्हणाला. छोटा राजनच्या माणसांना तयार केले जात होते अशा महाराष्ट्राच्या बाहेरच्या ठिकाणी अशी कोणतीही अटक झालेली नव्हती, असे हा अधिकारी म्हणाला.

मुंबईचे क्राईम बँ्रच पोलीस आणि आयबी यांच्यात भांडणे लागली अशी आणखी एक घटना घडली होती. ती म्हणजे राजनच्या माणसाला आयबीने आश्रय दिला आहे असे सांगण्यात येत असताना त्याला दिल्लीतून करण्यात आलेली अटक. हा अटक झालेला साथीदार हा राजनच्या टोळीचा महत्वाचा खबऱ्या होता.

Web Title: Singh's charge is invalid; Mumbai police claim that the Operation Encounter is genuine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.