मुंबईत बाजारसमिती बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:09 IST2018-11-27T12:07:54+5:302018-11-27T12:09:27+5:30
भाजीपाला : सोमवारी तर वर्षभरातील सर्वात कमी आवकची नोंद झाली असून फक्त ८२९ टन भाजीपाला व फक्त ४ लाख जुडी पालेभाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.

मुंबईत बाजारसमिती बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची टंचाई
शासनाच्या विरोधात २७ नोव्हेंबरला मुंबई बाजारसमिती बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारपासूनच कृषी माल कमी मागविण्यास सुरवात केली आहे. शनिवारी मार्केटमध्ये २१५३ टन भाजीपाला व ७ लाख २८ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली होती. परंतु सोमवारी तर वर्षभरातील सर्वात कमी आवकची नोंद झाली असून फक्त ८२९ टन भाजीपाला व फक्त ४ लाख जुडी पालेभाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.
बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजीपाल्याची तीव्र टंचाई होणार असून ग्राहकांना जादा दराने भाजीपाला विकत घ्यावा लागणार आहे. भाजी मार्केटमधील आवक घटली असली तरी कांदा- बटाट्याची आवक मात्र प्रचंढ वाढली आहे. सोमवारी तब्बल २४६४ टन कांदा बाजारात विक्रीसाठी आला होता. यामुळे कांदा ६ ते १९ रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर, बटाटाही ७ ते १८ रूपये किलो दराने विक्री होत आहे.