Join us  

पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा एकदा ३० सप्टेंबरपर्यंत दिली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:40 AM

गणेशोत्सवानंतर बदल्या कराव्यात, असे पत्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गृह विभागाला दिले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात झाल्या असल्या तरी पोलीस दलातील उर्वरित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.गणेशोत्सवानंतर बदल्या कराव्यात, असे पत्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गृह विभागाला दिले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत उद्या संपत असताना आता मुदतवाढीची भूमिका घेत बदल्या ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येतील, असे परिपत्रक गृह विभागाने शुक्रवारी काढले. गेल्या तीन दिवसांत अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांसह अन्य सर्व अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्या व्हावयाच्या आहेत.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्र सरकार