मुंबई- आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली, गांधी कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला गेला असून, स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय, कर्नाटक निवडणुकीनंतर तुम्हाला ईव्हीएम घोटाळा आढळला नाही काय, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.
400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय; मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 12:44 IST