Join us

मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:50 IST

हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईहून नेवार्कसाठी उड्डाण घेतलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय वैमानिकाला आला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले. ही घटना बुधवारी घडली.

या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप  आहेत. एअर इंडियाने या प्रवाशांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करून दिली. शिवाय, एअर इंडिया तसेच अन्य विमान कंपन्यांमार्फत प्रवाशांची  पुढील व्यवस्था करून दिली आहे.

तीन तासांच्या प्रवासानंतर लक्षात आला बिघाड

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-१९१ या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. त्यानंतर तीन तासांचा प्रवास केल्यावर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय वैमानिकाला आला.  त्यानंतर वैमानिकाने हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले आणि या विमानाने मुंबईत सुरक्षित लँडिंग केले. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Air India Mumbai-Newark flight returns after suspected technical issue.

Web Summary : An Air India flight from Mumbai to Newark returned to Mumbai airport on Wednesday due to a suspected technical fault. All passengers are safe and accommodated in hotels. Alternative travel arrangements are being made by Air India and other airlines.
टॅग्स :एअर इंडिया