मुंबई महानगरपालिकेच्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची उद्धवसेना आणि राज ठाकरे यांनी मनसे या पक्षांनी युती करत राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा-शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू असताना राज ठाकरे यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम सोबत असल्याने भाजपावाले माज करत आहेत. काही लोकांना मुंबई हातात घ्यायची आहे. त्यांचं हे स्वप्न गाडण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. संकट नीट ओळखा,आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या, याची आकडेवारी मांडून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितासमोर वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. आता मुंबई वाचवायची जबाबजारी आपली आहे. आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाच्या लढाईसारखी आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई हातात राखायची आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Web Summary : Raj Thackeray urges MNS workers to unite with Uddhav Sena to save Mumbai from BJP's alleged dominance using Modi and EVMs. He emphasizes unity, prioritizing Mumbai's Marathi identity over personal interests in the upcoming BMC elections, calling it a fight for survival.
Web Summary : राज ठाकरे ने मनसे कार्यकर्ताओं से उद्धव सेना के साथ एकजुट होकर मोदी और ईवीएम के इस्तेमाल से भाजपा के कथित प्रभुत्व से मुंबई को बचाने का आग्रह किया। उन्होंने एकता पर जोर दिया, आगामी बीएमसी चुनावों में व्यक्तिगत हितों से ऊपर मुंबई की मराठी पहचान को प्राथमिकता दी, इसे अस्तित्व की लड़ाई कहा।