Join us  

११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 2:31 AM

दोन दिवसांत ४० हजार होतील

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मुंबईतील तब्बल ११ विभागांमध्ये अद्यापही एक हजाराहून अधिक असल्याचे समोर आले आहे. तर बोरीवली, मालाड, भांडुप, घाटकोपर या चार विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याची संख्या सरासरी आठ ते नऊ टक्के आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धरावी आणि वरळी या विभागांमध्ये आता रुग्ण वाढण्याची संख्या सर्वांत कमी ३.१ टक्के असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत आतापर्यंत ३३ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

३१ मेपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारांहून अधिक असेल, असा अंदाज केंद्राच्या पथकाने वर्तवला होता. मात्र महापालिकेने गेल्या महिन्याभरात केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या सद्य:स्थितीत २२ हजार असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. मात्र अद्यापही धारावी, भायखळा, सायन, वडाळा, कुर्ला, वांद्रा, अंधेरी, विलेपार्ले, वरळी, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, गोवंडी, परळ, घाटकोपर या विभागांमध्ये रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. आतापर्यंत ९,०५४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वरळी विभागात सर्वाधिक म्हणजे ८३३ एवढे आहे.

एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या सात दिवसांमध्ये दुप्पट होत होती. यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजार अधिक असेल, असा अंदाज केंद्राने व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून २० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार मे महिन्याच्या पंधरवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवसांवर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

विभाग आतापर्यंत रुग्ण डस्चार्जजी उत्तर (धारावी, प्रभादेवी) २७२८ ६१७भायखळा, नागपाडा २४३८ ८०३एफ उत्तरमाटुंगा, सायन, वडाळा २३७७ ६७७एल कुर्ला २३२१ ५१०एच पूर्व वांद्रे पूर्व, खार २०९४ ६१५के पश्चिम अंधेरी पश्चिम २०४९ ६७४जी दक्षिण वरळी, प्रभादेवी १९०५ ८३३के पूर्व अंधेरी पूर्व, जोगेश्वरी १८७५ ५८३एम पूर्व देवनार, गोवंडी १६९६ ४३५एफ दक्षिण परळ १६४८ ३९६एन घाटकोपर १५२५ ३००

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई