Join us  

अवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 6:46 AM

रस्ते तुंबले, रेल्वे खोळंबली : दक्षिण मुंबईला सर्वाधिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची पार दैना उडवली. पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक खोळंबली, तर पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची अवस्था बिकट झाली. या पावसाने या मौसमात दुसऱ्यांदा दक्षिण मुंबईला झोडपून काढले. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या बारा तासांत पडला.

दुरवस्थेचे खापर विरोधकांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर फोडले. तर पालिकेने पावसाच्या प्रमाणाचा दाखला दिला. हा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला. पावसाने मुंबईची दैना केली असताना सत्ताधाºयांकडून आणि महापालिकेकडून नेहमीप्रमाणे मोठ्या पावसाचे कारण सांगितले जात आहे. मात्र, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे ती ब्रिटिशकालीन आहे. त्यात वाढ झालेली नाही.

पूरस्थितीचा धोका ओळखून कंटूर मॅपिंग व्हायला हवे, तो शहराच्या विकास नियमावलीचा भाग बनायला हवा होता. पावसाच्या पाण्याचा निचरा करायचा असेल तर त्याचा ओशनोग्राफीचा अभ्यास अत्यावश्यक आहे, तो झालेला नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पही आता कालबाह्य झाला आहे. आता नव्याने यासंदर्भात सर्वेक्षण करून धोरण आखण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांचे दरवाजे समुद्री सपाटीपेक्षाही खाली आहेत. यावर कधी काम करणार? अशी कामांची जंत्री आशिष शेलार यांनी वाचून दाखविली. तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या १२ तासांत पडला. वातावरणीय बदलांमुळे असे घडत आहे. याला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन विविध प्रयत्न करीत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.प्रत्येक दुर्घटनेनंतर नव्या योजनेचे पतंग उडविले जातात. पण, त्या पूर्ण होत नाहीत. १२ वर्षे धूळ खात पडलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्प २६ जुलैच्या जलप्रलयानंतर बाहेर काढला गेला. त्याला १५ वर्षे उलटली तरी तोही अजून पूर्ण झालेला नाही. मग, आजच्या पावसानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलेली पूर नियंत्रक टाक्यांची योजना अंमलात यायला किती वेळा मुंबई बुडण्याची वाट पाहायची, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.सप्टेंबरमधील मोठा पाऊसगेल्या काही वर्षांमधील सप्टेंबरमधील दिवसभरातील मुंबईतील मोठ्या पावसाचा विचार करता २० सप्टेंबर २०१७ रोजी ३०३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आता २३ सप्टेंबर २०२० रोजी २८६.४ मिलीमीटर पाऊस पडला. तर ५ सप्टेंबर २०१९ रोजी २४२.२, २१ सप्टेंबर २०१६ रोजी १४२.६, १ सप्टेंबर २०१४ रोजी ११५.८, ४ सप्टेंबर २०१२ रोजी १८५.३ पाऊस नोंदवला गेला होता. याआधी २३ सप्टेंबर १९८१ रोजी सर्वाधिक ३१८.२ मिलीमीटर एवढा पाऊस नोंदवला गेला होता.संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊसपडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या बारा तासांत पडला. धारावी, दादर भागात ३३२ मीमी पावसाची नोंद झाली. मागील बारा तासात सुमारे सात हजार दशलक्ष लिटर पाण्याचा म्हणजेचएक तुळशी तलाव भरेल इतक्या पाण्याचाउपसा करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :पाऊसमुंबई