आज मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे. मुंबईत आज मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापालिका निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढले आहेत.
अनिल परब म्हणाले की, "मी यापूर्वी शाई अशा प्रकारे गायब होताना कधीही पाहिली नाही. मतदानानंतर बोटावर जी खूण केली जात आहे, ती निवडणुकीची शाई नसून केवळ एक मार्कर आहे. हा मार्कर सहजपणे पुसला जाऊ शकतो. यामध्ये निश्चितच काहीतरी मोठी गडबड आहे."
नेमका आरोप काय?
परब यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, जर ही शाई पुसली जात असेल, तर त्याचा गैरवापर करून 'बोगस मतदान' केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. "निवडणुकीसाठी वापरली जाणारी शाई अनेक दिवस निघत नाही. मात्र, या निवडणुकीत वापरला जाणारा मार्कर वेगळाच आहे," असेही त्यांनी म्हटले.
विरोधकांचा सामूहिक आक्षेप
केवळ अनिल परबच नव्हे, तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले. राज ठाकरे यांनी दावा केला की, सॅनिटायझर वापरून ही शाई सहज निघत आहे, ज्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मतदान करणे शक्य होत आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
या आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे की, २०११ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाटलीऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. तसेच, केवळ शाई पुसल्याने कोणीही पुन्हा मतदान करू शकत नाही, कारण मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराची अधिकृत नोंद ठेवली जाते.
Web Summary : Anil Parab raised concerns about easily erasable ink markers used in Mumbai's municipal elections, suggesting potential for voter fraud. Other leaders echoed these concerns, while the Election Commission clarified marker use since 2011, assuring voter records prevent double voting.
Web Summary : अनिल परब ने मुंबई नगर निगम चुनावों में आसानी से मिटने वाले स्याही मार्करों के उपयोग पर चिंता जताई, जिससे मतदाता धोखाधड़ी की संभावना है। अन्य नेताओं ने भी यही चिंता व्यक्त की, जबकि चुनाव आयोग ने 2011 से मार्कर उपयोग को स्पष्ट किया, मतदाता रिकॉर्ड से दोहरे मतदान को रोकने का आश्वासन दिया।