स्थानिक पोलिसांना डावलले

By Admin | Updated: June 30, 2014 23:03 IST2014-06-30T23:03:06+5:302014-06-30T23:03:06+5:30

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एसआरपीतून आलेल्या कर्मचा:यांना नियम धाब्यावर बसवून पदोन्नती देण्यात आली आहे.

Local police arrested | स्थानिक पोलिसांना डावलले

स्थानिक पोलिसांना डावलले

>राजेश कदम - कळंबोली
राज्य राखीव दलातून जिल्हा किंवा आयुक्तालयात आलेल्या पोलिसांची सेवाज्येष्ठता बदलून आलेल्या दिवसांपासून गृहीत धरली जाते, हा नियम असतानाही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एसआरपीतून आलेल्या कर्मचा:यांना नियम धाब्यावर बसवून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तालयातील कर्मचा:यांना डावलले गेले असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यासंदर्भात काहींनी पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. असे असले तरी बाबूंकडून वरिष्ठ अधिका:यांना मिस गाईड केले जात असल्याने आम्हाला न्याय मिळत नाही, अशा शब्दात संबंधित पोलीस कर्मचा:यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
पोलीस दलातही वेगवेगळे विभाग असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस, लोहमार्ग पोलीस, गुप्त वार्ता विभाग, सीआयडी याशिवाय राज्य राखीव पोलीस दल हा एक वेगळा विभाग असतो. विशेषत: राज्य पोलीस आणि राखीव दलाची यंत्रणा ही वेगवेगळी आहे. दोन्ही विभागांचे कामकाज वेगळे असून राज्य राखीव दलाच्या तुकडीला बंदोबस्तासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी पाठविले जाते. दरम्यान, राज्य राखीव दलातील कर्मचारी जिल्हा किंवा आयुक्तालयात जाण्यासाठी इच्छुक असतात. मात्र बदलीसाठी किमान 1क् वष्रे सेवा होणो आवश्यक असल्याने ती पूर्ण झालेले जवान जिल्हा किंवा आयुक्तालयात बदली होण्यासाठी अर्ज करतात. त्यानुसार अनेकांची बदलीही केली जाते. मात्र ती करताना ज्या अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतात. त्यामध्ये राज्य राखीव दलाचे ज्या कर्मचा:यांची बदली जिल्हा पोलीस दलात करण्यात आल्यास, त्याची सेवाज्येष्ठतेच्या क्रमवारीत सर्वात शेवटी पुन:प्रस्तावित केली जाईल, ही मुख्य अट असते ती मान्य केल्यावरतीच जिल्हा जिल्हा पोलीस दल किंवा आयुक्तालयात बदली केली जाते. या व्यतिरिक्त जिल्हा पोलीस दलात बदली झाल्यानंतर संबंधितांना मुख्यालयात सशस्त्र कार्यासाठी पाच वर्षाकरिता नियुक्त करण्याची अट आहे. असे असतानाही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील स्थानिक कर्मचा:यांना नियमात बसत असताना त्याचबरोबर सेवाज्येष्ठता असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. सर्व प्रवर्गाचा विचार केल्यास तीनशेपेक्षा जास्त कर्मचा:यांवर अन्याय झालेला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातील 26 कर्मचा:यांना बढती मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उलट एसआरपीतून आलेल्या चौघांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि 22 कर्मचा:यांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
 
4हा प्रकार माहिती अधिकाराखाली उघड करण्यात आला असून बढतीमध्ये डावलले गेलेल्या कर्मचा:यांना या संदर्भात पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे अर्ज केलेला असून पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर इतर वरिष्ठ अधिका:यांनी वारंवार भेटून यासंदर्भात न्याय देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र आयुक्तालयात आलेले बाबू यामध्ये खो घालीत असल्याचे संबंधित कर्मचा:यांचे म्हणणो आहे. दरम्यान, पोलीस अधिका:यांना शासनाचे परिपत्रक त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडून याबाबतीत देण्यात आलेला निकालाची प्रतही देण्यात आली आहे. असे असतानाही संबंधित कर्मचा:यांना बढती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 
 
1क् वष्रे सेवा केलेल्या एसआरपीतील कर्मचा:यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदली करून जाण्यास अधिक कल दिसतो आणि ती संख्याही मोठी आहे. दरम्यान, नवी मुंबईत लागलीच पदोन्नती मिळतेच त्याचबरोबर मुख्यालयात न पाठवता वाहतूक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी नेमणूक मिळते. शिवाय सेवाज्येष्ठता कमी केली जात नसल्याचे काही कर्मचा:यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 
 
पदोन्नती देताना संबंधीत कर्मचा:याची बॅच कोणत्या सालची आहे ते तपासले जाते. एसआरपीमध्ये त्याने किती वष्रे सेवा केली याचाही विचार केला जातो. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ असून त्याबाबत माहिती घेण्याच्या सूचना आम्हाला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आमचा रिहय़ू चालू आहे. येत्या दोन तीन महिन्यात याबाबत अंतिम निर्णय लागेल.
- अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, मुख्यालय

Web Title: Local police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.